रेणुका मिसाळ, डॉ. के. एस. गाढे आले हे आरोग्यदायी आहे. आल्याचे नियमित सेवनाने स्मरणशक्तीमध्ये वाढ होते, आल्यामध्ये रक्तप्रवाह सुरळीत ठेवायची तसेच रक्तातील साखरेची पातळी आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्याची नियंत्रित ठेवण्याची क्षमता आहे. प्रक्रिया उद्योगासाठी आल्यास चांगली मागणी असते..कच्च्या आल्याचा आहारात समावेश केल्याने पोटदुखीची समस्या उद्भवत नाहीत.मायग्रेनच्या दुखण्यामध्ये कच्चे आले खूप फायदेशीर मानले जाते. कच्चे आले हृदयासाठी खूप फायदेशीर मानले जाते. आल्याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करता येते. कच्चे आले रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते..Ginger Turmeric Crops: आले, हळद पिकांसाठी आता संघर्ष करणार.सोलणेआले लवकर वाळविण्यासाठी आणि त्याची चव व सुगंध टिकविण्यासाठी त्यांची साल काढणे महत्त्वाचे आहे. पूर्णपणे परिपक्व झालेल्या आल्याच्या बाह्य त्वचेला बांबूच्या टोकदार काठीने स्क्रॅप करून काढले जाते. यामुळे बाह्य त्वचेच्या खालील तेलधारक पेशींचे नुकसान होत नाही. चाकूने खोल खरवडल्याने तेलाचे प्रमाण कमी होते, त्यामुळे असे सोलणे टाळावे. सोललेले आले वाळवण्यापूर्वी धुवावे. त्यामुळे कोरडे झालेले आले सुगंधी, चविष्ट आणि तिखट होते..वाळवणेकापणीच्या वेळी ताज्या आल्याची आर्द्रता सुमारे ८० ते ८२ टक्के असते, जी सुरक्षित साठवणुकीसाठी १० टक्क्यांपर्यंत कमी करावी लागते. एकाच थरात पसरवून आले उन्हात वाळवावे. हे पूर्ण वाळण्यासाठी ८ ते १० दिवस लागतात..Ginger Price: आल्याचे दर टिकून; तसेच काय आहेत सोयाबीन, कापूस, तूर आणि ज्वारीचे आजचे बाजारभाव.पॉलिश, स्वच्छता आणि ग्रेडिंगवाळविलेल्या आल्याचे पॉलिश करणे म्हणजे त्याची कोरडी त्वचा आणि सुरकुत्या काढून टाकणे. यासाठी आले कठीण पृष्ठभागावर घासले जाते.साठवणउच्च घनतेच्या पॉलिथिलीन किंवा तत्सम पॅकेजिंग मटेरियलमध्ये हवाबंद कंटेनरमध्ये आले साठवावे. दोन वर्षांहून अधिक काळ साठविल्यास सुगंध, चव आणि तिखटपणा कमी होतो..पावडर निर्मितीसर्वप्रथम आले स्वच्छ धुऊन घ्यावे. त्यानंतर जिंजर ब्लांचिंग यंत्रामध्ये ११० ते १३० अंश सेल्सिअस तापमानास ५ ते १० मिनिटे उकळून घ्यावे. त्यानंतर जिंजर स्लाइसिंग यंत्राद्वारे त्याचे बारीक बारीक काप करावेत. वाळविण्यासाठी ड्रॉइंग ओव्हनचा वापर करावा. तीन ते सात तासांसाठी ७० ते ९० अंश सेल्सिअस तापमानात पूर्ण कोरडे होईपर्यंत त्याची वाळवणी करावी. वाळलेल्या आल्याचे काप ग्राइंडिंग यंत्रामध्ये टाकून त्याचे पावडर तयार करावी..Ginger Farming: आले पिकाचे निरीक्षण करून रासायनिक फवारणीवर भर.सुंठ निर्मितीमलबार पद्धतस्वच्छ केलेले आले सुमारे दहा तास पाण्यात ठेवले जाते. त्यानंतर त्याची साल काढून २ टक्के चुन्याच्या द्रावणात सात तास भिजत ठेवले जाते. त्यानंतर द्रावणातून काढून बंद खोलीत ठेवले जाते. आल्याच्या कंदाला १२ तास गंधकाची धुरी देण्यात येते. त्यानंतर कंद बाहेर काढून दोन टक्के चुन्याच्या द्रावणात सहा तास भिजत ठेवतात. परत १२ तास गंधकाची धुरी देतात. ही पद्धती तीन वेळा करावी लागते, यामुळे आल्याच्या कंदांस पांढरा रंग प्राप्त होतो. प्रक्रिया केलेले आले सूर्यप्रकाशामध्ये वाळवले जाते आणि त्यानंतर गोणपाटाच्या साहाय्याने स्वच्छ केले जाते..सोडा, खास मिश्रण पद्धतीसुंठ सोडा व खास मिश्रण पद्धतीमध्ये आले स्वच्छ करून ८ ते १० तास पाण्यात भिजत ठेवले जाते. त्यानंतर त्याची साल काढावी. त्यानंतर १.५ × २ फूट आकाराच्या गॅल्व्हनाइज्ड जाळीच्या पिंजऱ्यामध्ये आले भरून घेतात.तीन वेगवेगळ्या भांड्यांमध्ये सोडिअम हायड्रॉक्साइडची २० टक्के, २५ टक्के आणि ५० टक्के तीव्रतेची द्रावणे तयार करून उकळून या द्रावणांमध्ये कंदाने भिजलेला जाळीचा पिंजरा २० टक्के द्रावणामध्ये पाच मिनिटे, २५ टक्के द्रावणामध्ये एक मिनिट आणि ५० टक्के द्रावणामध्ये अर्धा मिनिट ठेवला जातो. त्यानंतर पिंजऱ्यातील आले ४ टक्के सायट्रिक ॲसिडच्या द्रावणात दोन तास बुडवून ठेवतात. या प्रक्रियेनंतर ते चांगले निथळून स्वच्छ सूर्यप्रकाशात वाळवले जाते. राहिलेली साल त्यानंतर काढली जाते..Ginger Rate: आल्याचे दर स्थिर; तसेच काय आहेत मोसंबी, तूर आणि सोयाबीनचे आजचे बाजारभाव .मूल्यवर्धित पदार्थकापसामग्री : १५० ग्रॅम आले, ४०० ग्रॅम साखर, ४० ग्रॅम तुळस,२ लिटर पाणीकृतीसर्वप्रथम आले आणि तुळस स्वच्छ धुऊन घ्यावी. साल काढून चाकूच्या मदतीने बारीक काप बनवा.एक लिटर पाण्यामध्ये बारीक चिरलेले आल्याचे काप टाकून थोडा वेळ उकळू द्यावे. चाळणीच्या मदतीने पाणी काढून टाकावे.गॅसवर ४०० ग्रॅम साखरेत पुरेसे पाणी मिसळून त्याचा पाक बनवून घ्यावा. त्यात तुळशीच्या पानांचा रस मिसळावा. आणि हे मिश्रण रात्रभर तसेच ठेवावे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एका स्वच्छ कापडावर काप पूर्णपणे वाळवावेत..पाकवडीसामग्री ः २५० ग्रॅम आले, २५० ग्रॅम साखर, चिमूटभर मीठ, अर्धा लिंबू रसकृतीसर्वप्रथम आले स्वच्छ धुऊन साल काढून टाकावी.आले बारीक चिरून तितक्याच प्रमाणात साखर मिसळावी. मिक्सरच्या साह्याने मिश्रण बारीक करावे.गॅसवर एका कढईत तूप गरम करून त्यामध्ये आले आणि साखरेचे मिश्रण टाकावे. त्यात चवीपुरते मीठ आणि लिंबू रस घालून मिश्रण दहा ते पंधरा मिनिट शिजवावे. मिश्रणाला चांगले घट्ट होईपर्यंत त्याला गॅसच्या मंद आचेवर शिजवून घ्यावे.मिश्रण घट्ट झाले की गॅस बंद करून, मिश्रण थोडे थंड झाले की एका ट्रे वर तूप लावून त्यावर हे मिश्रण टाकावे. त्यांच्या वड्या तयार कराव्यात. मिश्रण पूर्ण प्रकारे थंड झाल्यावर वड्या ट्रे मधून काढून घ्याव्यात..मुरंबासामग्री ः २५० ग्रॅम किसलेले आले, ५०० ग्रॅम साखर, २ कप पाणी, १ चमचा लिंबाचा रस, १ चमचा केशर (ऐच्छिक), ३ कुटलेले वेलदोडेकृतीआले स्वच्छ धुऊन साल काढून किसून घ्यावे.एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात किसलेले आले घालावे आणि ५ ते १० मिनिट उकळावे. त्यामुळे आले मऊ होते. उकळलेले आले चाळणीतून काढून पाणी गाळून घ्यावे.जाड बुडाच्या भांड्यात साखर आणि पाणी एकत्र करून मध्यम आचेवर ठेवून साखर विरघळू द्यावी.साखरेचा पाक तयार झाल्यावर त्यात उकळलेले आले घालावे आणि मंद आचेवर शिजू द्यावे.मुरंबा शिजताना त्यात लिंबाचा रस घालावा. यामुळे टिकवण क्षमता वाढते.केशर आणि वेलदोडे घालून मुरंबा चांगला एकत्र करावा.मुरंबा घट्ट आणि चमकदार झाल्यावर गॅस बंद करा आणि थंड होऊ द्यावे.थंड झाल्यावर स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीत भरावा.- रेणुका मिसाळ ८५३०५७५२०४ (एम.टेक., विद्यार्थी, अन्न तंत्र महाविद्यालय, परभणी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.