AI-Based Elephant Tracking Technology: हत्तींचा कळप रात्रीच्या प्रवासाला निघतो. ज्या मार्गावरून ते पिढ्यान्पिढ्या ये-जा करत आले आहेत, त्याच परिसरातून ते पुढे जात असतात. पण आता त्यांच्या मार्गावर रेल्वेरूळ आहेत. हत्ती हे रेल्वेरूळ ओलांडून जाताना जर रेल्वे आली, तर अपघात हा ठरलेला. २० डिसेंबर २०२५ राेजी पहाटे झालेला अपघात अत्यंत भीषण हाेता. मध्य आसामच्या होजाई जिल्ह्यात मिझोराम-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस जंगली हत्तींच्या कळपाला धडकल्याने सात हत्ती ठार झाले आणि एक पिलू जखमी झाले हाेते. .रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हत्तींचा कळप दिसताच लोको पायलटने आपत्कालीन ब्रेक लावले होते. मात्र आपत्कालीन ब्रेक लावले तरी वेगाने धावणाऱ्या आणि पूर्ण क्षमतेने भरलेल्या ट्रेनला पूर्णपणे थांबण्यासाठी बरेच अंतर लागते. तेव्हा चालकाला हत्ती दिसण्यापूर्वीच त्याची उपस्थिती ओळखता यायला हवी यासाठी भारतीय रेल्वेला उपाय शाेधायचा हाेता. यासाठी रेल्वे आणि वन विभागांनी मिळून प्रयत्न सुरू केले. .IOT Technology: याक पालनासाठी ‘आयओटी’चे स्मार्ट तंत्रज्ञान.देशभरात हत्तींच्या अधिवासांना जोडणारे १५० च्या आसपास हत्ती मार्ग (Elephant Corridors) आहेत. त्यांचा अभ्यास करण्यात आला. त्यातून १२७ संवेदनशील रेल्वे मार्गांचे, एकूण ३४५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराचे सर्वेक्षण करण्यात आले. याचवेळी मदुक्कराई वनक्षेत्रात, तमिळनाडू वन विभागाने हत्तींचे अपघात हाेऊ नये म्हणून वापरलेल्या उपायांचाही अभ्यास केला गेला. तमिळनाडूतील पुथुपथी परिसरातील संवेदनशील रेल्वेमार्गालगत AI-सक्षम २४ थर्मल कॅमेरे बसवले आहेत..हे कॅमेरे चोवीस तास प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवतात. हत्ती रेल्वेमार्गाच्या दिशेने येताना आढळले, की वन विभागाच्या पथकांना आणि रेल्वे अधिकाऱ्यांना तातडीचा इशारा मिळतो. त्यानंतर स्टेशन मास्तर आणि लोको पायलट यांच्याशी समन्वय साधला जातो. या उपायांमुळे सुमारे अडीच वर्षांच्या कालावधीत ७१०० पेक्षा अधिक रिअल-टाइम अलर्ट या प्रणालीद्वारे देण्यात आले. .Smart Farming: ‘स्मार्ट फार्मिंग’ हाच शाश्वत प्रगतीचा मार्ग.अधिकाऱ्यांच्या मते, या समन्वित प्रतिसादामुळे सुरक्षित रेल्वे मार्ग ओलांडणे शक्य झाले आणि या कालावधीत त्या रेल्वेमार्गावर एकाही हत्तीचा मृत्यू झाला नाही. तमिळनाडूने आता निश्चित ठिकाणी बसविलेल्या कॅमेऱ्यांपलीकडे देखरेख वाढविण्यासाठी AI-सक्षम ड्रोन देखील वापरण्यास सुरुवात केली आहे. या अभ्यासाचा उपयाेग करून भारतीय रेल्वेने Distributed Acoustic Sensing (DAS) या तंत्रज्ञानावर आधारित AI-सक्षम Intrusion Detection System विकसित केली..त्याची चाचणी फेब्रुवारी २०२६ पर्यंत ईशान्य रेल्वे मार्गावर घेण्यात आली. आता ही प्रणाली भारतीय रेल्वेच्या ईशान्य सीमांत रेल्वेसह ईस्ट कोस्ट रेल्वे, दक्षिण रेल्वे आणि दक्षिण-पूर्व रेल्वे अशा आठ रेल्वे झोनमधील संवेदनशील भागांमध्येही लागू हाेण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. म्हणजेच आता अंधारात लोको पायलटला स्वतःच्या डोळ्यांनी हत्ती दिसण्याची आणि काही सेकंदांत ब्रेक लावण्याची वाट पाहावी लागणार नाही. हत्ती रुळांवर येण्यापूर्वीच रेल्वेला त्याच्या हालचालीची सूचना मिळू शकते. .या तंत्रज्ञानामध्ये रेल्वे रुळांच्या बाजूने आधीपासून टाकलेल्या ऑप्टिकल फायबर केबल्सचा मोठ्या सेन्सर नेटवर्कप्रमाणे वापर केला जातो. हत्ती रेल्वे रुळांच्या जवळून चालत असताना त्यांच्या हालचालींमुळे जमिनीमध्ये आणि परिसरात सूक्ष्म कंपने निर्माण होतात. DAS ही कंपने फायबर-ऑप्टिक केबलच्या माध्यमातून टिपते. त्यानंतर AI प्रणाली या संकेतांचे विश्लेषण करते आणि हत्तींच्या हालचालींशी संबंधित नमुने ओळखते. .हत्ती संवेदनशील रेल्वे मार्गाजवळ आढळल्यास ही प्रणाली लोको पायलट, स्टेशन मास्तर आणि रेल्वे नियंत्रण कक्षाला रिअल-टाइम इशारा देते. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना जवळ येणाऱ्या ट्रेनचा वेग कमी करण्यासाठी किंवा ट्रेन थांबविण्यासाठी अधिक वेळ मिळतो. या प्रणालीला ‘गजराज सुरक्षा’ असे नाव देण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाची सुरुवात ईशान्य भारतातील चाचण्यांपासून झाली. आता १४ राज्यांमधील जवळपास १९६५ किलोमीटरचे ७७ मार्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी प्राधान्याने निवडण्यात आल्याची माहिती शासनाने दिली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.