Revenue Department: महसूल विभागासह शासनाच्या विविध खात्यांच्या सेवांचे विकेंद्रीकरण करण्याच्या हेतूने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अलीकडील काही वर्षांपासून होत आहेत. शहरासह प्रत्येक मंडल ते विधानसभा मतदारसंघ मर्यादित झालेल्या या अभियानात तालुक्यातील चार हजार ९४० जणांना लाभ मिळाला आहे. त्यामुळे महाराजस्व आले दारी, लाभ मिळतोय भारी अशी प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहेत..महसूल विभागाच्या पुढाकाराने महाराजस्व अभियानाची अंमलबजावणी दरवर्षी केली जाते. हे अभियान मंडलनिहाय राबविले जाते. या वर्षी, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एका ठिकाणी या अभियानाची अंमलबजावणी केली. या अभियानामध्ये महसूलतर्फे विविध दाखले, ॲग्रीस्टॅक, संजय गांधी निराधार, जीवंत सातबारा, महिलांना शेतकरी दर्जा, फेरफार शुल्क माफीचे उतारे, वारसा नोंद आदींची सेवा देण्यात आली..Women Farmer Status: शेती, शेतीपूरक व्यवसायातील महिलांना ‘शेतकरी’ म्हणून मान्यता.याशिवाय कृषी विभाग, जिल्हा परिषद, वीज महावितरण, बचत गट, आरोग्य विभागासह नगरपरिषद आदी विभागांचे स्टॉल लावून जनतेला सेवा उपलब्ध करून दिल्या. अनेक दिवसांपासून प्रलंबित प्रश्नही यानिमित्ताने तडीला नेले. विशेष करून घरकुल योजना, पीएम किसान, ॲग्रीस्टॅक नोंदणी, ई- केवायसी, कृषी यांत्रिकीकरण, संजय गांधी योजना, आधार कार्ड दुरुस्ती, नवीन काढणे आदींची सेवा प्रभावी ठरत आहे. प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्या मार्गदर्शनाने मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवकांसह विविध विभागांचे प्रतिनिधींकडून नियोजन केले होते..Land Linking Process: फार्मर आयडीमध्ये जमीन जोडण्याची प्रक्रिया ठप्प.दरम्यान, शासकीय विभागातील कामे म्हणजे ‘सहा महिने थांब...’, अशी अवस्था असल्याचा अनुभव जनतेला येतो. हा शिक्का पुसून काढण्यासाठीच शासनाने अभियानाद्वारे जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याची उपयुक्तताही वाढत चालली आहे. अभियानात काम करून घेण्याचा चांगला अनुभव जनतेला येत असल्याने प्रतिसादही मिळत आहे. एकाच छताखाली सर्व शासकीय विभागांच्या योजनांचा लाभ मिळत असल्याने ग्रामीण भागातील जनतेचे तालुक्यापर्यंतचे हेलपाटेही वाचत आहेत..दृष्टिक्षेपात दिलेले लाभराज्य-केंद्राच्या योजना ३०४४जिवंत सातबारा ३६०महिलांना शेतकरी दर्जा १२५मुख्यमंत्री पाणंद ११२५स्थानिक स्वराज्य संस्थाच्या योजना १७१.महाराजस्व अभियान ग्रामीण जनतेला आधारवड ठरली आहे. प्रत्येक योजनेचा लाभ मिळत असल्याने जनतेचा प्रतिसादही चांगला आहे. सेवांचे विक्रेंद्रीकरण केल्याने अधिकाधिक जनतेपर्यंत योजना पोहोचण्यास मदत होत आहे. यापुढेही अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे होईल.- ऋषिकेत शेळके, तहसीलदार.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.