Future Employment Opportunities: भारतीय शेती ही केवळ उत्पादनाची व्यवस्था नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंधांची एक सशक्त साखळी आहे. या साखळीतील सर्वांत महत्त्वाचा दुवा म्हणजे शेतकरी आणि त्याच्यासोबत काम करणारे शेतमजूर. अनेक दशकांपासून शेतीमध्ये तीन प्रकारचे कामगार आढळतात. वार्षिक (सालकरी गडी), हंगामी कामगार आणि नियमित कंत्राटी कामगार. या तिन्ही घटकांचे शेतकऱ्यांशी असलेले संबंध केवळ मजुरीपुरते मर्यादित नव्हते तर विश्वास, परस्परावलंबित्व, सामाजिक बांधिलकी आणि भावनिक जिव्हाळ्यावर आधारित होते..कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये शेती, सिंचन, भूमापन, करप्रणाली आणि कृषी व्यवस्थापन यांचा सविस्तर उल्लेख आढळतो. राज्याने शेतीचे संरक्षण करणे, सिंचनाची व्यवस्था उभारणे आणि उत्पादन वाढविणे हे शासनाचे कर्तव्य मानले होते. या काळात मोठ्या जमिनींचे व्यवस्थापन करण्यासाठी कायमस्वरूपी कामगार, गुराखी, सिंचन व्यवस्थापक आणि देखरेख करणारे कर्मचारी नेमले जात. तरीही त्यांचे संबंध पूर्णतः व्यावसायिक नव्हते. त्यांच्यावर मालकाची सामाजिक जबाबदारीही असे. यादव, बहामनी, निजामशाही, आदिलशाही आणि पुढे मराठा काळात गाव हा आर्थिक जीवनाचा केंद्रबिंदू बनला. प्रत्येक गावात पाटील, कुलकर्णी, बलुतेदार आणि अलुतेदार अशी परस्परावलंबी व्यवस्था होती..आता जपानमध्ये वृद्धत्वामुळे रोबोटिक शेती वेगाने विकसित होत आहे. कामगार व्यवस्थापन तंत्रज्ञानावर आधारित झाले आहे. नेदरलँडमध्ये हरितगृह शेतीमध्ये अत्यंत प्रशिक्षित तंत्रज्ञ कार्यरत असून, प्रत्येक कर्मचारी उच्च कौशल्याचा असतो. इस्राईलमध्ये सिंचन, सेन्सर आणि डेटा विश्लेषण करणारे तज्ज्ञ पारंपरिक मजुरांपेक्षा अधिक महत्त्वाचे ठरले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये मोठ्या शेतांवर हंगामी कामगारांसाठी डिजिटल भरती, कार्यनियोजन आणि वेतन प्रणाली विकसित झाल्या आहेत..Future Farming: गुरुमंत्रांचा गजर !.भारतालाही या अनुभवांमधून तंत्रज्ञान आणि मानवी मूल्ये यांचा संतुलित संगम साधावा लागेल. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील सालकरी गड्यांची संख्या कमी होत असून परराज्यातील शेतमजुरांची संख्या वाढली आहे. आजची ऊस शेती जवळ जवळ आउटसोर्स पद्धतीने केली जाते. डेअरी आणि पोल्ट्रीमध्ये उत्तर प्रदेश किंवा बिहारचे मजूर काम करतात. मालक फक्त सुपरवायझरचे काम करताना दिसतात. येत्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता रोबोटिक्स, यांत्रिकीकरण, हवामान बदल, शिक्षणाचा प्रसार, श्रमकायदे, डिजिटल अर्थव्यवस्था आणि ग्रामीण समाजातील बदल यांमुळे हे संबंध पूर्णपणे नव्याने घडणार आहेत..रोबोट करतील कामेपूर्वी गावातील अनेक कुटुंबे एखाद्या शेतकऱ्याकडे वर्षभरासाठी सालदार म्हणून राहत असत. त्यांना पगाराबरोबरच धान्य, निवास, सणावाराचे कपडे, जनावरांची व्यवस्था आणि सामाजिक संरक्षण मिळत असे. काही मोठ्या शेतांवर कायमस्वरूपी काम करणारे नियमित कर्मचारीही असत. या व्यवस्थेमध्ये व्यवहार आर्थिक असला, तरी त्यामध्ये मानवी नातेसंबंधांना मोठे स्थान होते. अनेकदा तीन-तीन पिढ्या एकाच शेतकऱ्याकडे काम करत असत. ट्रॅक्टर, हार्वेस्टर, ड्रोन, रोबोटिक वीडर, स्वयंचलित सिंचन प्रणाली आणि एआय आधारित शेतीमुळे मानवी श्रमांची गरज कमी होईल. .Smart Farming: ‘स्मार्ट फार्मिंग’ हाच शाश्वत प्रगतीचा मार्ग.ग्रामीण युवक अधिक शिक्षित होत असल्याने पारंपरिक शेतमजुरी स्वीकारण्याची वृत्ती कमी होईल. ते कृषी तंत्रज्ञ, ड्रोन ऑपरेटर, मशीन ऑपरेटर किंवा डेटा व्यवस्थापक म्हणून काम करण्यास प्राधान्य देतील. ऑनलाइन मजूर नोंदणी, डिजिटल करार, मोबाइलद्वारे वेतन आणि ई-वर्क प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणावर होईल. त्याऐवजी व्यावसायिक ‘फार्म मॅनेजर’ नेमले जातील. शेतीकामाचे नियोजन एआय करेल. .काही कामे पूर्णपणे रोबोट करतील. ड्रोन ऑपरेटर, एआय कृषी विश्लेषक, मृदा आरोग्य तंत्रज्ञ, सिंचन तंत्रज्ञ, सेन्सर देखभाल अभियंता, डेटा व्यवस्थापक, जैविक शेती निरीक्षक, कार्बन क्रेडिट समन्वयक अशी नवीन पदे निर्माण होतील. या कर्मचाऱ्यांचे संबंध व्यावसायिक सेवा पुरवठादार असे असतील. एआयमुळे कामाचे वेळापत्रक, हवामान अंदाज, पाणी व्यवस्थापन, उत्पादन नियोजन, रोग निदान, मजूर नियोजन, वेतन गणना, उत्पादकता मापन बाबींमध्ये कामगार आणि शेतकरी यांचे संबंध बदलतील..भविष्यात स्वतंत्र मजूर न राहता सेवा गट तयार होतील. उदाहरणार्थ - ड्रोन सेवा सहकारी संस्था, कापणी सेवा गट, सिंचन व्यवस्थापन गट, मृदा परीक्षण गट, कृषी यंत्र सेवा संस्था, शेतकरी व्यक्तीऐवजी संस्थांकडून सेवा घेतील. पुढील काळात प्रत्येक कृषी कामगाराला आरोग्य विमा, निवृत्तीवेतन, कौशल्य प्रशिक्षण, डिजिटल ओळखपत्र, रोजगार नोंदणी, सामाजिक सुरक्षा निधी अशा सुविधा मिळू शकतात..यामुळे कामगारांचे जीवनमान उंचावेल. परिणामी ग्रामीण भागात मानवी नातेसंबंध कमी होणे, लघु शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा खर्च परवडणे, कौशल्य नसलेल्या मजुरांची बेरोजगारी, डिजिटल दरी, करारातील वाद, मशिनवर वाढते अवलंबित्व आणि ग्रामीण सामाजिक ऐक्यात घट हे सर्व अपरिहार्य आहे. आता आपण एका अशा वळणावर उभे आहोत जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि कौशल्याधारित अर्थव्यवस्था या संबंधांना पुन्हा एकदा नव्याने आकार देणार आहेत. शेतकरी-कामगार संबंध भावनिकतेकडून व्यावसायिकतेकडे वळत आहेत.shekharsatbara@gmail.com.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.