Fruit Crop Insurance : सांगली जिल्ह्यातील चार हजार शेतकऱ्यांनी घेतला फळपीक विमा

Crop Insurance Scheme : अतिवृष्टी, पावसाचा खंड, यामुळे फळ पिकांचे नुकसान झाल्यास त्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी फळपीक विमा योजना सुरू झाली आहे.
Fruit Crop Insurance
Fruit Crop Insurance Agrowon
Published on
Updated on

Sangli News : जिल्ह्यात पूनर्रचित हवामान २०२४-२५ साठी अंबिया बहरासाठी फळपीक विमा भरण्याचे काम सुरू आहे. या योजनेत द्राक्ष आणि केळी उत्पादक ४ हजार ८६ शेतकऱ्यांनी फळपीक विमा घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फळपीक विमा योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

अतिवृष्टी, पावसाचा खंड, यामुळे फळ पिकांचे नुकसान झाल्यास त्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी फळपीक विमा योजना सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना विमा योजनेत अर्ज करावा लागतो. नुकसान झाले तर त्याचे पंचनामे होऊन भरपाई मिळते. यंदाची पुनर्रचित हवामान पीकविमा योजना सुरू झाली आहे.

Fruit Crop Insurance
Fruit Crop Insurance : सिंधुदुर्गातील ७०० वर बागायतदार फळपीक विमा परताव्यापासून वंचित

कृषी विभागाने प्रत्येक तालुक्यात फळपीक विमा योजनेची प्रचार आणि प्रसिद्धीही केली आहे. तसेच या योजनेते महत्त्व शेतकऱ्यांमध्येही पटवून दिले आहे. त्यामुळे शेतकरी पीकविमा घेण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे चित्र आहे.

यंदाच्या फळपीक विमा या योजनेत ४ हजार ७८ द्राक्ष उत्पादक शेतकरी तर आठ केळी उत्पादक शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले आहेत. केळी आणि द्राक्ष पीकविमा योजनेची मुदत संपली आहे. सध्या आंबा, आणि डाळिंब पिकांचा विमा भरण्याचे काम सुरू आहे. आहे. आंबा पिकासाठी ३१ डिसेंबर तर डाळिंबासाठी १४ जानेवारी २०२५ ही अंतिम मुदत आहे.

भरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांची पाठ

जिल्हा कृषी विभाग फळपीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करत आहे. परंतु नैसर्गिक आपत्तीने फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्याचे पंचनामे केले जातात. त्याचा सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला जातो.

Fruit Crop Insurance
Fruit Crop Insurance : ‘फळपीक विमा’ काही अनुत्तरित प्रश्‍न

मात्र, फळ पिकांचे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना भरपाई मिळत नाही. गेल्या तीन वर्षांपासून फळपीक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. शेतकरी पात्र आहे की अपात्र आहेत, त्यामुळे अपात्र असलेल्या शेतकऱ्यांपैकी किती शेतकरी पात्र होणार याबाबत शेतकऱ्यांना कसलीच माहिती नाही.

गतवर्षी १ हजार शेतकरी पात्र

जिल्ह्यात गतवर्षी म्हणजे २-२३-२४ या वर्षात ६ हजार ७४५ शेतकऱ्यांनी फळपीक विमा घेतला होता. त्यासाठी शेतकऱ्यांनी ७ कोटी ७३ लाख ९५ हजार ७०८ रुपये विमा हप्त्यापोटी रक्कम भरली होती. त्यापैकी १ हजार ४२ शेतकरी या विमा योजनेसाठी पात्र झाले. या पात्र शेतकऱ्यांना १ कोटी ९४ लाख ४३ हजार ६८० रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com