Dr.Amol Kolhe : शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभावाची गॅरंटी कधी? कोल्हे मोदींच्या गॅरंटीवर बरसले

Amol Kolhe Gavbhet Daura : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत माजी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मतदारसंघात गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून भेटींचा सपाटा सुरू केला आहे. यावेळी कोल्हे यांनी, कांदा निर्यातबंदीवरून मोदींवर टीका केली आहे.
Dr.Amol Kolhe
Dr.Amol Kolhe Agrowon

Pune News : कांदा निर्यातबंदीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी खासदार अमोल कोल्हे यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीवरून टीका केली आहे. कोल्हे यांनी, कांदा निर्यातबंदीने सामान्य शेतकऱ्यांची झालेली दयनीय अवस्था आता विकोपाला गेली असून याला मोदी सरकार जबाबदार आहे, असे म्हटले आहे. कोल्हे यांनी ही टीका शिरुर मतदार संघातील कानसे येथे गावभेट दौऱ्या वेळी सोमवारी (ता.०१) केली.  यावेळी कोल्हे यांनी, केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणावरून टीका करताना, कांदा बंदी केल्यापासून सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. 

तसेच केंद्राने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा बाहेर जाऊच नये म्हणून ४० टक्के निर्यात शुल्क लावले. तेंव्हा थेट जापानमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार कांदा विकत घेईल, असे घाईगडबडीत ट्विट केले. यानंतर कांद्याला भाव वाढ मिळत असतानाच ३ डिसेंबरला थेट कांदा निर्याद बंदीचा आदेश केंद्राने काढला.

Dr.Amol Kolhe
Amol Kolhe : केंद्र सरकारच्या शेतीविरोधी धोरणाबद्दल अर्थसंकल्पीय अधिवेशनात खा. कोल्हेंची फटकेबाजी! 

यामुळे ४० ते ४५ रूपये किलोवर गेलेला कांदा आता १० आणि १२ रूपये किलोच्या घरात आला आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याचे किलोमागे ३० रूपयांनी नुकसान झाले आहे. तर हा निर्णय घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या आशा, आपेक्षांवर पाणी फिरवण्याचे काम आणि पाप मोदी सरकारने केल्याची टीका देखील कोल्हे यांनी केली आहे. 

तसेच कोल्हे यांनी, आता कांदा उत्पादक शेतकरी भर उन्हातान्हात शेतातील कांदा काढत आहे. मात्र त्यांच्या कांद्याला भाव मिळणार का याची गॅरंटी नाही. तर आपले पंतप्रधान मोदी हे सतत सर्व गोष्टींची गॅरंटी देतात पण सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पिकाच्या हमीभावाची गॅरंटी ते देत नाहीत. मोदी ही गॅरंटी देऊच शकत नाहीत. हे या देशाचे दुर्दैव असल्याचे म्हटले आहे. 

Dr.Amol Kolhe
Dr. Amol Kolhe : केंद्र, राज्यातील सरकारांच्या गाजराच्या शेतीला अच्छे दिन

मध्यप्रदेशच्या निवडणूका झाल्यानंतर आपल्या देशाला पुर्णवेळ कृषी मंत्री नाही अशी देखील टीका  कोल्हे यांनी केली आहे. तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह सर्वसामान्य शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी "संसद ते सडक" पर्यंत सातत्याने संघर्ष केला. शेतकऱ्यांचे प्रश्न कोल्हे उठवले, विचारले मात्र सत्ताधाऱ्यांना जाग आली नाही. यामुळे आता सत्ताधाऱ्यांना धक्का देण्याची वेळी आल्याचेही कोल्हे यांनी म्हटले आहे.

तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह शेतकरी माता भगिनींनी कांदा निर्यातबंदीनंतर आपल्या व्यथा मांडल्या आहेत. या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा, तळमळ आणि आक्रोश दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना ऐकू येत नाही हे आपल्या कृषिप्रधान देशाचं दुर्दैव असल्याची टीका कोल्हे यांनी केली आहे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com