
Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात यंदाही बऱ्याच भागात पाणीटंचाई जाणवत असून चारा टंचाई भेडसावण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना अडचण येऊ नये म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात चारा, मुरघास नेण्याला जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. दोन महिन्यासाठी ही बंदी असून ११ एप्रिलपासून हा आदेश लागू केला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात गतवर्षी पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने यंदा पाणीटंचाई निर्माण होणार नाही अशी परिस्थिती दिसत होती. मात्र उन्हाचा चटका सुरू झाला की लगेच पाणीटंचाई जाणवू लागली. त्याचा परिणाम चारा उत्पादनावर होणार असे दिसतेय. मोठ्या नद्यांच्या परिसरात, धरण क्षेत्रात मात्र पाणी बऱ्यापैकी उपलब्ध आहे.
तेथे यंदा शेतकऱ्यांनी चारा घेण्याला प्राधान्य दिले आहे. चारा उत्पादन झाल्यावर शेतकरी चाऱ्याची विक्री करतात. उन्हाळ्याची अजून अडीच महिने जायचे आहे. त्यानंतर चांगला पाऊस झाला तर चारा उपलब्ध व्हायला वीस दिवसांचा कालावधी लागतो. यंदा पाण्याबरोबर चारा टंचाईची भीती आहे,
शिवाय खरीप, रब्बीत उपलब्ध होणाऱ्या चाऱ्याचा विचार केला तर पाथर्डी, जामखेड, शेवगाव या तालुक्यांत अडीच महिन्यांपर्यंतच उपलब्ध चारा पुरेल अशी स्थिती आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातून दरवर्षीच उन्हाळ्यात शेजारच्या मराठवाड्यात चारा नेला जातो.
जर जिल्ह्यातून चारा, मुरघास विक्रीला गेला टंचाईला सामोरे जावे लागेल अशी स्थिती असल्याने शेतकऱ्यांना अडचण येऊ नये म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात चारा, मुरघास व टोटल मिक्स रेशन (टीएमआर) नेण्याला जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आसिया यांनी या बाबत ११ एप्रिलला आदेश काढले असून, तेथून पुढे हा आदेश दोन महिने लागू राहील असे नमूद केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.