Interview with Dr. Ravindra Prabhudesai: जमीन सुपीकतेसाठी एकात्मिक खत वापरावर द्या भर
Kharif Season Condition: युद्धजन्य परिस्थिती आणि जागतिक पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे खतांच्या उपलब्धतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत सेंद्रिय खतांचा वापर वाढवून रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करणे हा दीर्घकालीन आणि शाश्वत उपाय ठरू शकतो, असे मत डॉ. रविंद्र प्रभुदेसाई, व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि. यांनी व्यक्त केले.