Farming Crisis: युद्धाच्या पार्श्वभूमीवर रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असताना त्यांच्या किमतीतही २० टक्के वाढ झाल्याने शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. .चालू वर्षी कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला. त्यात युद्धजन्य परिस्थितीमुळे शेतमाल निर्यातीवर विपरीत परिणाम झाला. तसेच, स्थानिक बाजारात कांद्याचे दर कमालीचे घसरले आहेत..Fertilizer Crisis: खरीप हंगामावर खतटंचाईचे सावट.कृषी विभागाने जून २०२६ च्या खरीप हंगामाची तयारी सुरू केली. या वर्षीच्या खरीप हंगामासाठी दोन लाख २२ हजार टन रासायनिक खतांचे आवंटन (साठा) मंजूर झाला आहे. मार्च २०२६ अखेर रब्बी हंगामातील एक लाख १८ हजार ९६८ टन खते शिल्लक आहेत. त्यामुळे जिल्ह्यासाठी एक लाख टनाची रासायनिक खतांची आवश्यकता आहे. युद्धामुळे रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जाते..Agriculture Input Crisis: पॅकेजिंग साहित्यटंचाईची खते, बियाण्यांना झळ.१५० ते ३०० रुपयांची वाढखतांच्या ५० किलोच्या एका गोणीमागे १५० ते ३०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. तणनाशकांचे दर प्रतिलिटर १०० ते १५० रुपयांनी वधारले. युरियाच्या किमती सध्या तरी स्थिर आहेत; परंतु त्यातही महिनाभरात वाढ होण्याची शक्यता आहे. .आता उन्हाळा सुरू असून, जूनमध्ये पेरणीवेळी या किमती अजून वाढण्याची शक्यता आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर ही दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.