Fertilizer Linking Issue Maharashtra News: राज्यात विशेषतः लातूर, पुणे, नागपूर, नाशिक, सांगली, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात युरिया खत खरेदी करताना दुकानदारांकडून इतर खते सुफला, फवारणी औषधे, जैविक औषधे, कीटकनाशके घेणे बंधनकारक केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी राज्यात खताचे लिंकिंग होत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या असल्याचे म्हटले आहे..याअनुषंगाने गुणनियंत्रण निरीक्षक आणि जिल्ह्यास्तरीय भरारी पथकांमार्फत तपासणी करण्यात आली आहे. सदर तपासणीमध्ये अनियमितता आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर खत (नियंत्रण) आदेश, १९८५ व अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५ नुसार कारवाई करण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून खतांसाठी लिंकिंग प्रणाली सुरु करण्यात आलेली नाही. तसेच खतांच्या लिंकिंगबाबत व अनियमिततेबाबत तक्रार प्राप्त झाल्यास त्याबाबत तपासणी करुन खत नियंत्रण आदेश, १९८५ चे उल्लंघन केल्याबाबत कारवाई केली जाते, असे कृषिमंत्र्यांनी बुधवारी (दि. २५ मार्च) विधानसभेत लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे..राज्यात लिंकिंग प्रणालीद्वारे युरिया खताची खरेदी करताना इतर महागडी खते घेण्याची सक्ती करण्यात येत असल्याबाबत आमदार अमित देशमुख, डॉ. आशिषराव देशमुख (सावनेर), शिवाजी पाटील (चंदगड), शंकर जगताप (चिंचवड), सत्यजित देशमुख (शिराळा), बबनराव यादव, रामदास मसराम (आरमोरी), विजय वडेट्टीवार आणि इतरांनी प्रश्न उपस्थित केले होते. .Fertilizer Linking Issue: दोघे भाऊ, मिळून खाऊ.त्यावर कृषिमंत्री भरणे यांनी दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, लिंकिंग संदर्भात दोषी विक्रेत्यांवर केलेल्या कारवाईबाबत संबंधित जिल्ह्यातील परवाना अधिकारी यांच्या कामकाजाची चौकशी करण्याचे आयुक्त (कृषी) यांना कळविण्यात येत आहे..राज्यात खत विक्रेते आणि उत्पादक यांच्याकडील खतांची गुण नियंत्रण निरीक्षकांकडून नियमितपणे तपासणी करण्यात येते. तसेच प्राप्त होणाऱ्या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी राज्यस्तर, विभागस्तर, जिल्हास्तरीय ४४ भरारी पथके नेमण्यात आली आहे. राज्यात लिंकिंग न करण्याबाबत वेळोवेळी सूचना देण्यात येतात..Urea Fertilizer Linking: खतांच्या लिंकिंगचा शेतकऱ्यांना भुर्दंड! २६६ रुपयांचं युरियाचं पोतं १,६५० रुपयांना; कैलास पाटील काय म्हणाले?.राज्यामध्ये ५०,४०४ खत विक्रेत्यांची आणि ७३५ खत उत्पादकांची तपासणी करण्यात आली. राज्यात खताचे एकूण १९,४५९ नमुने तपासले असून १,९७४ नमुने अप्रमाणित आहेत. खताचा एकूण २,४७०.६७ टन साठा जप्त करण्यात आला असून त्याचे मुल्य ४४९.९२ लाख इतके आहे. राज्यात खताचे ९६७ परवाने निलंबित आणि ५१० परवाने रद्द केले आहेत. तसेच ६७ पोलीस केसेस दाखल केल्या आहेत, अस कृषिमंत्री भरणे यांनी सांगितले. .युरिया खत विक्रीमध्ये होणारे गैरव्यवहार थांबविण्यासाठी क्षेत्रीयस्तरावर माहिती स्वरुपात ई- पॉस ( e-POS) प्रणालीवर तपासणी करुन ५३४ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तर ६१ कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खत (नियंत्रण) आदेश, १९८५ मधील तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे तसेच खताचा पुरवठा करताना अनियमितता केल्या कारणामुळे बल्लारशहा (जि. चंद्रपूर) येथे गुन्हा दाखल केला आहे, असे त्यांनी लेखी उत्तरात नमूद केले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.