Electricity Problem : खानदेशात विजेचा लपंडाव सुरू

धुळे, जळगाव, नंदुरबार भागात कृषिसंबंधी वीजपुरवठा करणाऱ्या कमाल रोहित्रांच्या फ्युजपेट्या बदलण्याची गरज आहे.
 Electricity
ElectricityAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात विजेचा मोठा लपंडाव सुरू आहे. शेतकरी ऐन हंगामाच्या काळात विजेच्या समस्येने त्रस्त झाले आहेत. रोहित्रांमधील बिघाड दुरुस्तीसाठीदेखील शेतकऱ्यांनाच खर्च करावा लागत आहे.

अनेक रोहित्रांच्या तारा २५ ते ३० वर्षांपूर्वीच्या आहेत. त्यांची वर्षानुवर्षे दुरुस्तीच झालेली नाही. यामुळे रोहित्र वारंवार खराब होत आहेत. तारा तुटणे, फ्यूज पेट्यांमधील समस्या, रोहित्रांची उपकरणे किंवा यंत्रणा खराब होणे, अशा समस्या वारंवार तयार होत आहेत.

या दुरुस्त्या, सुधारणा करण्यासाठी शेतकऱ्यांनाच एकत्रितपणे खर्च करावा लागत आहे. त्यासाठी खासगी कर्मचारी किंवा तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागते. अनेक रोहित्रांच्या केबल खराब झाल्या आहेत.

रोहित्रातून फ्युजपेटीत वीजपुरवठा करणाऱ्या केबल वर्षानुवर्षे बदलण्यात आलेल्या नाहीत. या केबलची किंमत तीन ते साडेतीन हजार रुपये आहे. त्यावरीच खर्चही शेतकऱ्यांनाच करावा लागत आहे. सध्या शेतात हंगाम आहे.

 Electricity
Solar Power : छ्तांवरील सौरऊर्जा निर्मितीसाठी ‘महावितरण’ला राष्ट्रीय पुरस्कार

केळी, वेलवर्गीय पिके, मका, गहू, बाजरी, कांदा व इतर भाजीपाला पिके शेतात आहेत. त्यांना रोज किंवा एक दिवसाआड पाणी द्यावे लागते.

यातच मागील दोन-तीन दिवस जळगावमधील चोपडा, जळगाव, धरणगाव, यावल, जामनेर, पाचोरा, भडगाव आदी भागात सुसाट वारा व हलका पाऊस अशी समस्याही होती. त्यात अनेक रोहित्र खराब झाले असून, त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे.

धुळ्यातील शिंदखेडा, धुळे व शिरपूर तालुक्यातही पावसासह वादळात रोहित्रांत बिघाड झाले आहेत. विजेचे खांब वाकून त्यांचेही नुकसान झाले आहे. तसेच तारा तुटून पडल्या आहेत.

याबाबतही संबंधित भागात तातडीने दुरुस्ती व सुधारणांची कार्यवाही वीज कंपनी किंवा संबंधितांनी हाती घेण्याची गरज आहे.

 Electricity
Akola News: वीजपुरवठ्यासाठी शिवसेनेचा ‘महावितरण’वर रुमणे मोर्चा

फ्यूजपेट्या बनल्या धोकादायक...

धुळे, जळगाव, नंदुरबार भागात कृषिसंबंधी वीजपुरवठा करणाऱ्या कमाल रोहित्रांच्या फ्युजपेट्या बदलण्याची गरज आहे. अनेक भागात या फ्युजपेट्या २५ ते ३० वर्षे तशाच आहेत. त्यात तुटलेले, खराब फ्यूज आहेत. पेट्या गंजून त्यांची माती होत आहे.

यामुळे अनेक गावांत अपघातही मागील काळात झाले आहेत. त्या धोकादायक असून, त्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे. दुरुस्ती, देखभाल यासाठी वीज कंपनी निधीची तरतूद करते, पण दुरुस्ती होतच नाही, अर्थात या निधीची विल्हेवाट कुठे लावली जाते , हादेखील प्रश्न आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com