New Delhi News: शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २१ व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली असतानाच, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (ता. ११) शेतकऱ्यांची प्रगती आणि समृद्धीसाठी ४२ हजार कोटींहून अधिक खर्चाच्या ऐतिहासिक योजनांची भेट देतील. पंतप्रधान मोदी कडधान्ये अभियान आणि पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या योजनांचा नवी दिल्ली येथून प्रारंभ करतील, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गुरुवारी (ता. ९) दिली. .देशभरात शेतीमाल उत्पादकता एकसमान नाही, काही भागांत ती खूप कमी आहे तर काही भागात अधिक आहे. आम्ही कमी उत्पादकता असलेले जिल्हे ओळखून आणि त्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आहे. जर कमी प्रमाणात उत्पादकता असलेल्या जिल्ह्यांचे उत्पन्न राष्ट्रीय सरासरीच्या बरोबरीने आणले तर देशाचे एकूण उत्पादन वाढण्यास मदत होईल..PM Kisan Samman Nidhi : सन्मान निधी नको शेतकऱ्यांना हवे स्वातंत्र्य.यामुळे देशांतर्गत गरज पूर्ण होईल आणि त्या संबंधित जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल. आम्ही अशा १०० जिल्ह्यांची निवड केली असून ज्यावर आमचे लक्ष केंद्रित असेल. पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेअंतर्गत या जिल्ह्यांमध्ये उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे चौहान यांनी सांगितले..ते म्हणाले, की भारत अजूनही कडधान्यांच्या बाबतीत स्वावलंबी झालेला नाही. कडधान्यांत आत्मनिर्भर होण्यासाठी, २०३०-३१ पर्यंत कडधान्ये अभियान निश्चित केले आहे. या दरम्यान, कडधान्यांच्या लागवडीखालील क्षेत्र २७५ लाखांवरून ३१० लाख हेक्टरपर्यंत वाढविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्याचबरोबर, कडधान्यांचे उत्पादनही २४२ लाखांवरून ३५० लाख टनांवर नेण्याचा प्रयत्न राहील. याव्यतिरिक्त, पंतप्रधान मोदी यशस्वी शेतकरी उत्पादक कंपन्या, नैसर्गिक शेती करणारे शेतकरी आणि अन्य शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत..PM Kisan 21st Installment: जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले २ हजार, महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना कधी मिळणार २१ वा हप्ता?.पंतप्रधान मोदी पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता शनिवारी (ता. ११) वितरित करतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. पण कृषिमंत्री चौहान यांच्या पत्रकार परिषदेनंतर किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता शनिवारी वितरित होणार नाही, हे स्पष्ट झाले असून यामुळे ९.७ कोटी शेतकऱ्यांना २ हजार रुपये मिळण्याची प्रतीक्षा लांबली आहे..दिवाळीपूर्वी मिळणार का पीएम किसानचे पैसेपंतप्रधान किसान सन्मान निधीचा २१ वा हप्ता नेमका कधी मिळणार? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान, मागील तीन हप्त्यांच्या तारखा पाहिल्या असता, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पीएम किसानचे पैसे मिळतील, अशी अपेक्षा आहे. याआधी दोन वेळा, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी २ हजार रुपये मिळाले आहेत. २०२४ मध्ये दिवाळीपूर्वी ५ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले होते. २०२२ मध्ये, दिवाळीपूर्वी १७ ऑक्टोबर रोजी पैसे मिळाले होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.