Bhavantar Yojana : बांधावर होणाऱ्या शेतमाल खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक

Soybean Procurement : ज्या शेतकऱ्यांचे नोंदणी करूनही सोयाबीन खरेदी झाले नाही, अशा शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना लागू करणार का? असा प्रश्नही आमदार पाटील यांनी विचारला.
Agriculture Issue
Farmers Issue Agrowon
Published on
Updated on

Dharashiv News : पणन विभागांतर्गत शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या अडचणींकडे बुधवारी (ता. दोन) पावसाळी अधिवेशनात आमदार कैलास पाटील यांनी सरकारचे लक्ष वेधले. यामध्ये भावांतर योजना व बांधावर होणाऱ्या खरेदीमध्ये शेतकऱ्यांची होणारी फसवणूकीत होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

त्यावर नियंत्रण ठेवण्याची हमी सरकारकडून देण्यात आली. यासोबत खरेदी केंद्रावर नोंदणी करूनही सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झालेले नाही. खरेदी केंद्र उशिरा सुरु होणे, खरेदी केंद्राची संख्या मर्यादित तसेच बारदाना व इतर अडचणीमुळे खरेदीच प्रमाण खूप कमी झालं आहे. ज्या शेतकऱ्यांचे नोंदणी करूनही सोयाबीन खरेदी झाले नाही, अशा शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना लागू करणार का? असा प्रश्नही आमदार पाटील यांनी विचारला.

यासोबत योजनेतील हे अनुदान कधीपर्यंत सरकार देणार असाही सवाल उपस्थित केला.शेतकऱ्यांच्या बांधावरून शेतीमालाची थेट खरेदी करण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढले आहे. पण यामध्ये अनेक व्यापारी हे माल खरेदी करतात व नंतर गायब होत असल्याचे प्रकार पाहायला मिळत आहेत.

व्यापारीची काहीच माहिती नसल्याने त्याची कुठे तक्रार देखील करता येत नाही. त्यामुळे अश्या खरेदीवर शासन नियंत्रण ठेवणार का? ज्या प्रकारे बाजार समिती मधील व्यापारावर सरकार नियंत्रण ठेवते त्याच पद्धतीने अशा खरेदीबाबत सरकार काय करणार आहे, असा प्रश्न आमदार कैलास पाटील यांनी उपस्थित केला. त्यावर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी उत्तर दिले.

Agriculture Issue
Bhavantar Yojana: कांद्याला भावांतर योजना लागू करा

ते म्हणाले की बांधावर होणारी खरेदी हा विषय अडचणीचा ठरत असल्याचे त्यांनी मान्य केले. बांधावर होणाऱ्या शेतीमालाची व्यापारी खरेदी तर करतात पण त्याचे पेमेंट करण्यावेळी ते गायब होतात. अशा खूप तक्रारी आपल्या विभागाकडे येत आहेत. हे व्यापारी कोण आहेत त्यांची कोणतीही माहिती शेतकऱ्यांना नसते.त्यामुळे ते पोलिस ठाण्यात तक्रार करतात पण तांत्रिक अडचणीमुळं गुन्हा नोंद होत नाही.

Agriculture Issue
Kapus Bhavantar Yojana: कापूस उत्पादकांसाठी भावांतर योजना राबवा

मागील काळात थेट खरेदी करण्यासाठी डायरेक्ट मार्केट लायसन्स वितरित करण्यात आले. हे परवाने मोठ्या प्रमाणात वितरित करण्यात आल्याने व त्यामध्ये काही चुकीच्या लोकांनीही परवाने काढले आहेत. तेच लोक याद्वारे शेतकऱ्यांना फसवत आहेत.

बाजार समिती मध्ये सरकारच खरेदी व्यवहार यावर नियंत्रण असते. आताही ज्या बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात अशी खरेदी होते त्या स्थानिक व्यापाऱ्यांनी परवाने काढून घ्यावेत. याच व्यापाऱ्यांनी ही खरेदी करावी किंवा कोणी खरेदी केली आहे यावर बाजार समितीने लक्ष द्यावे, अशी सरकारची भूमिका असल्याचे मंत्री रावल यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com