Water Scarcity : पुरंदरमध्ये पाण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

Water Shortage : पुरंदर तालुक्यात पर्जन्यमान अति अल्प प्रमाणात झाल्याने जमिनीतील पाणीपातळी खालावली आहे.
Water Crisis
Water Crisis Agrowon
Published on
Updated on

Pune News : पुरंदर तालुक्यात पर्जन्यमान अति अल्प प्रमाणात झाल्याने जमिनीतील पाणीपातळी खालावली आहे. अनेक गावांत मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडलेला आहे. प्रशासनाकडून कोणत्याच उपाययोजना होत नसल्यामुळे शेतकरी वर्गाकडून आता वेगवेगळ्या पद्धतीने शेती, जनावरांसाठी व पिण्यासाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

पुरंदर तालुक्यातील अनेक गावांतील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. यामुळे विहिरीतील गाळ काढून पाणीपातळी वाढवण्याचे तसेच, जास्त खोल बोअर घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तर अनेकांनी विहिरीत आडवे, उभे बोअर मारणे सुरू केले आहे. पाणीपातळी खोल गेल्याने काहीच उपयोग होत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

Water Crisis
Water Scarcity : सातारा जिल्ह्यात टँकरची वाटचाल दीड शतकाकडे

कसेही करून शेती व जनावरे जगविणे हाच एकमेव पर्याय शेतकऱ्यांसमोर राहिला आहे.तालुक्यातील अनेक गावांत जेसीबी, पोकलॅड तसेच क्रेनच्या साहाय्याने विहिरीतील गाळ काढला जात आहे.

५० ते ६० फूट खोल विहीर असल्यास त्या विहिराचा गाळ पोकलॅडद्वारे काढला जात आहे. तर त्यापेक्षा जास्त खोल असलेल्या विहिरींचा गाळ क्रेन (यारी) द्वारे काढला जात आहे. पूर्वीच्या काळात हे काम सर्व शेतकरी मिळून करीत असत. पण सद्यःस्थितीत हे काम बाहेरील कामगार घेऊन करावे लागत आहे.

Water Crisis
Water Scarcity : निवडणुकीच्या धामधुमीत चारा, पाणीटंचाईकडे दुर्लक्ष

पुरंदरमधील दुष्काळामुळे जमिनीची पाणीपातळी अत्यंत खालावली गेल्यामुळे आता गाळ काढून येईल ते पाणी वापरून जनावरे तसेच शेती जगवण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले आहे. त्यामुळे आता मिळेल त्या परिस्थितीत शेतकरी पशुधन व शेती वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

प्रतिफूट ४ हजार ५०० रुपये

पुरंदर तालुक्यात क्रेनचालक व मजुरांकडून प्रतिफूट ४ हजार ५०० रुपयांनी शेतकरी गाळ काढून घेत आहेत. तर पोकलॅड आणि जेसीबीद्वारे विहिरीतील गाळ काढून पाणीसाठा वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर, पोकलॅडसाठीही प्रति तास ४ हजार ५०० रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागत असल्याची माहिती शेतकऱ्यांकडून देण्यात आली.

‘पाण्यासाठी शेवटचा प्रयत्न’

पावसाळ्यात नदी, ओढे-नाले, बंधारे भरून वाहिले नसल्याने तालुक्यातील अनेक भागात, पाणीपातळी खाली गेल्यामुळे विहिरी, बोअरवेल तसेच इतर पाणीसाठे आटले आहेत. तर विहिरीतील गाळ काढून थोडे फार पाणी वाढेल या आशेने शेतकरी शेवटचा प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती वाळुंज येथील शेतकरी नितीन इंगळे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com