
Parbhani News: नागपूर ते गोवा दरम्यान नवीन होणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध वाढत चालला आहे. या महामार्गासाठी शेतजमिनी घेतल्या जात असल्याने परभणी जिल्ह्यातील अनेक गावांमधील शेतकरी चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर पोखरणी नरसिंह येथे ३१ गावांतील शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली.
या बैठकीत ठरलं की, कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनी दिल्या जाणार नाहीत. सरकारने सुरू केलेल्या मोजणी प्रक्रियेलाही शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. काही ठिकाणी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना थांबवण्यात आलं आहे. शेतकऱ्यांनी स्पष्ट केलंय की, "जमीन घेण्याआधी आमचा जीव घ्या, पण आम्ही जमिनी देणार नाही."
शेतकऱ्यांनी असा इशारा दिला आहे की, जर सरकारने जबरदस्तीने जमीन घेण्याचा प्रयत्न केला, तर ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. रास्ता रोको, जेल भरो अशा प्रकारची आंदोलने करण्याची त्यांची तयारी आहे.
शेतकऱ्यांचा असा विश्वास आहे की, त्यांची जमीन हा त्यांच्या जीवनाचा आधार आहे आणि ती गमावणे त्यांना मंजूर नाही.सरकारकडून शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनी संपादित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, पण शेतकऱ्यांनी विरोधाचा झंझावात उभारल्याने हे काम अडथळ्यात आलं आहे.
सध्या मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना शेतकरी अडवत आहेत. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये यावरून तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, सरकारने त्यांच्या जमिनीऐवजी दुसरा मार्ग शोधावा. या बैठकीत शेतकऱ्यांनी आपली एकजूट दाखवली आणि सरकारला त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याची मागणी केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.