MahaDBT : ‘महाडीबीटी’वरील प्रलंबित अर्जातून लाभार्थींची निवड

Agriculture Scheme : कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी अनुदान मिळावे म्हणून महाडीबीटी पोर्टलवर सुरू केलेली सोडत पद्धत बंद झाली आहे.
MahaDBT
MahaDBTAgrowon
Published on
Updated on

Dharashiv News : कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी अनुदान मिळावे म्हणून महाडीबीटी पोर्टलवर सुरू केलेली सोडत पद्धत बंद झाली आहे. महाडीबीटीवर अर्ज करूनही निवड होत नसल्याने शेतकरी गोंधळात होते.

मात्र, कृषी विभागाने अर्ज निवड प्रक्रियेत सोडत पद्धतीऐवजी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही नवी पद्धत लागू केली असून त्यानुसार महाडीबीटी पोर्टलवरील प्रलंबित अर्जाचा निपटारा होणार आहे. योजनांचे उद्दिष्टाशी सांगड घालून या पद्धतीने लवकरच शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

यामुळे जिल्ह्यातील चार लाख १६ हजार ७३१ अर्ज केलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज निकाली निघणार आहेत. एखाद्या शेतकऱ्याने ठिबक सिंचनाच्या अनुदानासाठी १० ऑगस्ट २०२४, तर दुसऱ्याने ११ ऑगस्टला अर्ज केलेला आहे. यामधून १० ऑगस्टला अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची अनुदानासाठी निवड केली जाईल. अर्जाच्या तारखेनुसार प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या प्रमाणे प्रलंबित अर्जाची निवड होईल. यामुळे प्रलंबित अर्जाचे काय होणार, असा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये आहे.

MahaDBT
MahaDBT Pre-Approval: ‘महाडीबीटी’कडून पूर्वसंमती मिळेना

मात्र, शासनाने या शेतकऱ्यांना दिलासा देत नवीन निवड पद्धतीत प्रलंबित राहिलेल्या अर्जाना प्राधान्य देण्यात येईल, असा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. कृषी योजनेतून मिळवण्यासाठी अनुदान महाडीबीटी संकेतस्थळावर शेतकरी अर्ज करतात. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी योजनांच्या लाभासाठी तब्बल ४ लाख १६ हजार ७३१ अर्ज केलेले आहेत.

यात केवळ ठिबक सिंचनाच्या अनुदानासाठी अर्ज केलेल्या २ लाख ३२ हजार अर्जाचा समावेश आहे. सोडत बंद केल्याने शेतकऱ्यांना कृषी अवजारे, पाइपलाइन, फळबाग लागवड, कांदा चाळ, ठिबक सिंचन आदी काहीच घेता आलेले नाही. त्यामुळे कृषी क्षेत्राच्या विकासाला वर्भभरापासून खीळ बसली आहे.

MahaDBT
MahaDBT: ‘महाडीबीटी’तील ४४ लाख प्रलंबित अर्ज वैध

मात्र, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीत प्रलंबित अर्जाना प्राधान्य देण्यात येणार असल्याने उशिरा का होईना या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्व अर्ज वैध ठरणार आहेत. तारखेनुसार या अर्जाची अनुदानासाठी निवड होईल.

हे अर्ज संपल्याशिवाय नवीन अर्ज निवडण्यास सुरवात होणार नाही. नवीन अर्जाची प्रक्रिया सुरू होताच कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना कळविण्यात येणार आहे. महाडीबीटीवरील लाभासाठी शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) काढणे बंधनकारक करण्यात असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com