Crop Insurance : संत्रा विमा अटींमुळे शेतकरी अडचणीत

Orange Crop Insurance : पीकविमा काढण्यासाठी काही अटी टाकण्यात आल्या आहेत. या अटीमुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे. बाभूळगाव तालुक्यातील संत्रा उत्पादकांना तशाच अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Orange
Orange Agrowon
Published on
Updated on

Yavatmal News : पीकविमा काढण्यासाठी काही अटी टाकण्यात आल्या आहेत. या अटीमुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे. बाभूळगाव तालुक्यातील संत्रा उत्पादकांना तशाच अडचणींचा सामना करावा लागत आहे. सातेफळ हे एकच सर्कल कृषी विभागाने नोटिफाइड केले आहे. त्यामुळे इतर भागांतील शेतकऱ्यांना पीकविमा काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

पीकविमा काढताना संबंधित पीक कमीत कमी २० हेक्टरवर असणे आवश्यक आहे. याशिवाय कृषी विभागाने तो भाग नोटिफाइड करणे आवश्यक आहे. या अटीमुळे नोटीफाइड नसलेल्या कमी प्रमाणात लागवड क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना पीकविमा काढता येत नसल्याचा प्रकार बाभूळगाव तालुक्यात समोर आला आहे.

Orange
Crop Insurance : शेवटची मुदत! रब्बी हंगामातील पिकांसाठी दोनच दिवस पोर्टल सुरू राहणार

बाभूळगाव तालुक्यातील सातेफळ सर्कल वगळता इतर भागांतील शेतकऱ्यांना ही अडचण जात आहे. कृषी विभागाने संत्री पिकासाठी सातेफळ हे एकच सर्कल नोटिफाइड केले आहे. या सर्कल व्यतिरिक्त इतर भागातही संत्री व हरभरा उत्पादक मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र या शेतकऱ्यांना पिकांचा विमा काढता येत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे.

बाभूळगाव सर्कलमधील जवळपास सर्वच संत्री उत्पादक शेतकरी व हरभरा उत्पादक शेतकरी यांच्यावर मागील काही वर्षांपासून अन्याय होत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे येथील संत्री उत्पादक शेतकरी व हरभरा उत्पादक शेतकरी यांचा पीकविमा निघत नाही. परिणामी, नुकसान झाल्यानंतरही शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

Orange
Farmers Insurance Scheme : गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचे ८४ प्रस्ताव मंजूर

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

पाचशे ते सहाशे एकर शेती असल्याशिवाय पीकविमा निघत नसल्याची माहिती कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिली. दरवर्षी निसर्गाचा कुठला ना कुठला प्रकोप होतो. यात संत्री व हरभऱ्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते. पीकविमा निघत नसल्याने शेतकरी कोणाला दाद मागू शकत नाहीत. यासाठी तालुक्याचे आमदार लक्ष देत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. नुकसान झालेल्या पिकासाठी कुणाला न्याय मागाचा असा प्रश्‍न शेतकऱ्यांचा आहे.

पीकविमा काढण्यासाठी कमीत कमी २० हेक्टरवर पीक असणे आवश्यक आहे. कृषी विभागाने संबंधित सर्कल त्या पिकांसाठी नोटिफाइड करणे गरजेचे आहे. ते असल्याशिवाय पीकविमा निघत नाही. बाभूळगाव तालुक्यात सातेफळ मंडलाचा संत्रा पिकासाठी समावेश केला आहे.
नीलेश जाधव, पीकविमा कंपनी प्रतिनिधी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com