
Akola News : तालुक्यात वन्यप्राण्यांकडून रब्बी पिकांचे नुकसान सुरूच असून तळेगाव बाजार परिसरात रानडुक्कर, हरिणांचे कळप धुमाकूळ घालत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. रब्बीतील हरभरा पिकाचे अतोनात नुकसान होत असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो आहे.
तळेगाव बाजार परिसरात वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात शेतांमध्ये धुमाकूळ घालून नुकसान करित असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. तळेगाव बाजार परिसरात बागायती पट्टा असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात हरभरा, कांदा, गहू, ज्वारी, पिकांची पेरणी झालेली आहे.
सध्या हरभरा पीक जोरदार असतानाच रात्री शेतात रानडुक्कर, हरीण, हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. शेतकरी पिकांचे रक्षण करण्यासाठी रात्री शेतात रखवाली करीत असतात.
मात्र थोडे दुर्लक्ष होताच वन्यप्राणी शेतात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. या बाबीकडे वन विभागाचे अधिकारी माहिती देऊनही दुर्लक्ष करीत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.