Agriculture Irrigation : सिंचनासाठी पाणी न दिल्याने शेतकऱ्यांचे उपोषण

Farmers' Hunger Strike : पाणीवापर संस्था व शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाणी न दिल्याने आक्रमक शेतकऱ्यांनी येथील पाटबंधारे विभाग कार्यालयासमोर गुरुवारपासून (ता. १८) बेमुदत उपोषण सुरू केले.
Farmer Hunger Strike
Farmer Hunger StrikeAgrowon
Published on
Updated on

Nashik News : पाटबंधारे विभागाने तालुक्यातील प्रमुख वितरिका क्रमांक ३६ वरील पाणीवापर संस्था व शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाणी न दिल्याने आक्रमक शेतकऱ्यांनी येथील पाटबंधारे विभाग कार्यालयासमोर गुरुवारपासून (ता. १८) बेमुदत उपोषण सुरू केले.

रात्री थंडीतही उपोषण सुरूच होते. अखेर दणक्यानंतर शुक्रवारी (ता. १९) सकाळी वितरिकेला पाणी सुटले; मात्र जोपर्यंत वितरिकेवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची भरणी होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनावर तालुक्यातील रब्बी हंगाम अवलंबून असतो. यंदा पाऊस कमी झाल्याने आवर्तनाच्या भरवशावर शेतकन्यांनी रब्बीची पिके व कांदालागवड केली आहे.

मात्र, वितरिका क्रमांक ३६ वरील शेतकऱ्यांना पाणीच न मिळाल्याने ५०० हेक्टरवर क्षेत्र पाण्यापासून वंचित असून, शेतकन्यांना लाखो रुपयांचा फटका पिकांच्या नुकसानीतून बसणार आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

Farmer Hunger Strike
Agriculture Irrigation Scheme : परभणी जिल्ह्यातील लाभार्थींना ३८ लाखांवर अनुदान वितरित

पालखेड कालव्याचे शेतीचे आवर्तनाचे पाणी वितरका क्रमांक ४५ ते ३७ पर्यंत दरवर्षीप्रमाणे पाणी देण्यात येते. वितरिका ३६ ला पाणी दिले, की एरंडगाव, जळगाव, विंचूर शाखा या वितरिकांना पाणी सुरू करून देतात, आमच्या वितरिकांना आडवा बांध करून पूर्णपणे बंद केले जाते. परिणामी, वितरिका क्रमांक ३६ वरील पाणीवाटप संस्थांना पाणी मिळत नाही.

हा प्रकार सलग पाच वर्षांपासून सुरू आहे. दरवर्षी वितरिका ३६ टेलला ठेवल्यामुळे पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नाही. वितरिका ३६ वर १४ पाणीवापर संस्था आहेत. यंदा एरंडगाव, विंचूर व जळगाव शाखेच्या वितरिकांना पाणी सुरू केल्यामुळे वितरिका ३६चे पाणी बंद झाल्याने उत्कर्ष व आदर्श (चिंचोडी), श्रीकृष्ण (पारेगाव), संजय (चिचोंडी), राघवेश्वर (चिंचोडी),

संत तुकाराम (अंगणगाव), चक्रधर या सर्व पाणीवापर संस्थांना पाणी मिळालेले नाही. या आवर्तनातून पाणी न मिळाल्यास या संस्थांच्या कार्यक्षेत्रातील पिकांची डोळ्यादेखत राखरांगोळी होणार असल्याने पाणी मिळेपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.

Farmer Hunger Strike
Agriculture Irrigation : शेतीसाठी पाणी हवे तर आधी पाणीपट्टी भरा

अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट न दिल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला व आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. बाजार समिती संचालक सचिन आहेर, साईनाथ मढवई, सोमनाथ मढवई, यतीन पटेल, श्यामराव मढवई, समाधान मढवई, बाबा जाधव, दिगंबर लोणारी, ज्ञानेश्वर मढवई, नामदेव मढवई, लखन पावळे, अजय मोरे, अजीज सय्यद, गणेश जाधव, बाळू खिल्लारे, चाळू भोसले यांच्यासह अनेक शेतकरी उपोषणस बसले आहेत.

पाणी सुटले असले, तरी वितरिकेवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे शेती सिंचन पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. हे पीक हातातून गेले तर आम्ही कसे जगायचे हा प्रश्न समोर आहे. जलसंपदा विभागाने शेतकऱ्यांचा प्रश्न विचारात घेऊन निर्णय घ्यायला हवेत.
साईनाथ मढवई, लाभधारक शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com