
Solapur News : उजनी कालव्यातील वितरिका क्रमांक ३७ मधून शेती पिकाला उन्हाळी हंगामासाठी अद्याप पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे या लाभक्षेत्रात असलेली पिके सध्या उन्हामुळे व पाण्याअभावी जळून चालली आहेत. कालवा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.
मंगळवेढा तालुका तसा दुष्काळी असला तरी उजनी कालवा व नदीमुळे तालुक्यामध्ये बागायती क्षेत्रात वाढ झाली. कालवा व नदी पट्ट्यातील क्षेत्र हे दहापेक्षा अधिक साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करीत आहे. त्यामुळे तालुक्यातील कारखानदारीबरोबर शेतकऱ्यांना शेतीतून उत्पन्नाचा आधार सापडला.
गतवर्षी उजनी धरण १०० टक्के भरल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. मात्र, याच कालव्यातून उन्हाळी हंगामात वेळेवर पाणी सोडले जात नाही. त्यामुळे उपलब्ध पाण्यावर आलेला जनावरांचा चारा व नवीन उसाचा फुटवा, भाजीपाला व फळपिके सध्या जळून चालली आहेत.
पिके वाळून जाताना पाहताना शेतकरी वर्गातून पाणी सोडण्याची मागणी होत आहे. मात्र कालवा प्रशासन चालढकल करीत आहे. त्यामुळे सध्या सुकलेली पिके हताशपणे बघण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पिके जतन करून आलेल्या पिकांवर कर्जाचा डोंगर कमी होईल, या आशेवर आलेल्या शेतकऱ्यांची सुकलेल्या पिकामुळे चिंता वाढली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.