
Beed News : केज, जि. बीड : आडस, मुलेगाव व कळमआंबा शिवारातील माळरानास सोमवारी (ता.१४) दुपारी गवतास अचानक आग लागली. या आगीत अंदाजे शंभर एकर माळरान व लगतच्या शेतकऱ्याचा सीताफळाच्या बागेसह ठिबक सिंचन पाइप जळून खाक झाल्याची घटना घडली.
तालुक्यातील आडस, मुलेगाव व कळमआंबा या तीन गावाच्या शिवाराच्या सीमेवरील माळरानास सोमवारी दुपारी अचानक आग लागली. आग लागल्याचे निदर्शनास येताच शेजारील शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
मात्र जवळ पाणी नसल्याने आग विझविण्यास विलंब झाल्याने आगीत शेतकऱ्यांचे बरेच आर्थिक नुकसान झाले. या आगीत शंभर एकर माळरान व आडस येथील शेतकरी दत्तात्रय दामोदर इंगोले यांच्या जमिनीतील पाच वर्षांपूर्वी लागवड केलेली पाच एकर क्षेत्रावरील सीताफळाच्या बागेसह त्यात पाणी देण्यासाठी अंथरलेले अंदाजे पाच लाख रुपये किमतीची ठिबकसिंचनचे पाइप जळून खाक झाले.
या आगीच्या घटनेत पाणी टंचाईच्या काळात थोडे-थोडे पाणी देऊन पाच वर्षांपासून स्वतः मुलांप्रमाणे जपलेली सीताफळाची बाग जळाल्याने शेतकऱ्याचे अंदाजे पाच लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाने आर्थिक मदत करण्याची मागणी केली जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.