
Dharashiv News : सततच्या पावसामुळे मोठे नुकसान होऊनही केवळ निकषात बसत नसल्याने जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळांतील शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. त्या सर्वांनाच मदत मिळायला हवी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
वस्तुनिष्ठ परिस्थितीचा आधार घेऊन सततच्या पावसाच्या निकषात बदल करत राज्य नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी मदत व पुनर्वसन खात्याच्या सचिवांना मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत, अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये धाराशिव, भूम, परंडा आणि तुळजापूर तालुक्यांतील २४ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली असताना प्रचलित निकषामुळे अतिवृष्टीची नोंद झाली नव्हती. मात्र, झालेले नुकसान मोठे होते.
त्यामुळे २०२२ मध्ये ओढवलेल्या आपत्तीवेळी केलेली प्रक्रिया अनुसरून उर्वरित २४ मंडळांत दोन वर्षापूर्वी ज्याप्रमाणे वस्तुनिष्ठ नुकसानीच्या निकषानुसार केलेल्या पाहणीचा अहवाल ग्राह्य धरला होता, अगदी तीच प्रक्रिया अनुसरून तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यावेळी केली होती, असे आमदार पाटील म्हणाले.
शासन निर्णयातील सततच्या पावसाचा ‘सलग पाच दिवसांच्या कालावधीत प्रत्येक दिवशी किमान १० मिलिमीटर पाऊस झाल्यास’ हा निकष शिथिल करून मंडळांमध्ये सलग पाच दिवसांच्या कालावधीमध्ये सरासरी ५० मि. मी. किंवा ५० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाल्यास’ असा बदल करून जिल्ह्यातील उर्वरित महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना राज्य नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मदत करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.