Ravikant Tupkar : शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस; रक्तदाब वाढला, प्रकृती खालावली

Ravikant Tupkar Protest : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य दर मिळण्याबरोबरच इतर मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या या आंदोलनाचा शनिवार (ता. ७) चौथा दिवस आहे.
Ravikant Tupkar
Ravikant TupkarAgrowon
Published on
Updated on

Pune News : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस आहे. तुपकर यांची शनिवारी (ता. ७) प्रकृती खालावली असून रक्तदाब वाढला आहे. यामुळे सध्या सिंदखेडराजा येथे शेतकऱ्यांचा संपात दिसत आहे. तर आपल्या जीवाला काहीही झाले तरी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेच पाहिजेत, असा ठाम भूमीका तुपकर यांनी घेतली आहे.

सोयाबीन-कापूस दरवाढ, पीकविमा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीला मजबूत कंपाउंड यांसह शेतकऱ्यांच्या महत्त्वपूर्ण मागण्यांसंदर्भात तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. ते शेकडो कार्यकर्त्यांसह ४ सप्टेंबरपासून सिंदखेडराजा येथील माँसाहेब जिजाऊ यांच्या राजवाड्यासमोर आंदोलनावर बसले आहेत.

Ravikant Tupkar
Ravikant Tupkar : सिंदखेडराजा येथे तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनास सुरुवात

तुपकर यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. तुपकर यांचा रक्तदाब वाढला असून रक्तातील साखरेचे प्रमाणही कमी झाले आहे. याबाबतची माहिती वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. तर आपल्या जीवाला काहीही झाले तरी पर्वा नाही. परंतु, शेतकऱ्यांचे प्रश्नावर सरकारने योग्य भूमीका घेतली पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारने सोडवले पाहिजेत. ते जोपर्यंत सोडवले जात नाहीत. तोपर्यंत मागे हटणार नसल्याची ठाम भूमीका तुपकर यांनी घेतली आहे.

Ravikant Tupkar
Ravikant Tupkar Protest : तुपकरांचे ४ सप्टेंबरपासून सिंदखेडराजात बेमुदत अन्नत्याग

दरम्यान शुक्रवारी (ता.६) रात्री तुपकर यांची स्थानिक उपविभागीय अधिकारी यांनी भेट घेतली. यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे तुपकर यांची तुपकर यांच्याशी फोनवर चर्चा झाली. यावेळी मुंडे यांनी फोनवरुन संवाद साधताना, आंदोलन थांबवा, मुंबईत या. आपण बैठकीत प्रश्न सोडवू असे आवाहन तुपकर यांना केले. तसेच तुमच्या सर्व मागण्या मान्य केल्या जातील, असा विश्वास देखील त्यांनी तुपकरांना दिला. मात्र तुपकर त्यांच्या मागण्यावर ठाम असून आंदोलनावर ठाम आहेत.

महाराष्ट्रात सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. पण शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य भाव मिळत नाही. त्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. सध्या कापूस व सोयाबीनला उत्पादन खर्चाचा अर्धा भाव देखील मिळत नसल्याची स्थिती आहे. यामुळेच शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे वेळोवेळी सरकारकडे विनंती करत आंदोलने केली आहे. मात्र सरकार काही लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळेच आता अन्नत्याग आंदोलन करावे लागत आहे.
- रविकांत तुपकर, शेतकरी नेते

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com