Farmers Death : शेतकरी आत्महत्या रोखण्यात अपयश

Agriculture Issue : सरत्या वर्षात अमरावती विभागाचा शेतकरी आत्महत्येचा रोखण्यात सरकारी यंत्रणांसह समाजसेवी संस्था व स्व. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनला अपयश आले आहे.
Farmer Death
Farmer DeathAgrowon
Published on
Updated on

Amaravati News : सरत्या वर्षात अमरावती विभागाचा शेतकरी आत्महत्येचा रोखण्यात सरकारी यंत्रणांसह समाजसेवी संस्था व स्व. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनला अपयश आले आहे. या वर्षभरात (जानेवारी ते नोव्हेंबर) तब्बल ३०६ शेतकऱ्यांनी कर्जापायी आत्महत्या केली. त्यापैकी केवळ ९१ आत्महत्याग्रस्त कुटुंबांना शासन मदत देऊ शकले आहे.

कर्ज काढून शेतीची लागवड केल्यानंतर नैसर्गिक आपत्ती व बाजारात शेतमाल मिळणारे न परवडणारे दर यामुळे आर्थिक गर्तेत सापडलेले शेतकरी नैराश्याने ग्रासले जात आहेत. वारंवार देण्यात येणाऱ्या कर्जमुक्तीनंतरही आत्महत्येचा प्रश्न कायमच आहे.

Farmer Death
Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

बियाण्यांसह खत व कीडनाशकांच्या वाढलेल्या किमती, मजुरीचे दर व हाती येणारी मिळकत याचा ताळमेळ जुळत नसल्याने कर्जफेडीच्या चिंतेने ग्रासलेल्या अमरावती विभागातील ९८५ शेतकऱ्यांनी या वर्षात आत्महत्या केली आहे.

शासनदप्तरी करण्यात आलेल्या तपासणीत ३०६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या शासकीय मदतीसाठी पात्र ठरल्या आहेत. त्यातील केवळ ९१ कुटुंबांना शासकीय मदत देण्यात आली आहे. ३९२ प्रकरणांत अद्याप चौकशीच झालेली नाही. त्यामुळे ती प्रलंबित आहे तर २८७ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली.

Farmer Death
Farmer Death : गुंता : शेतकरी आत्महत्यांचा!

बुलडाणा व वाशीम जिल्ह्यातील एकाही कुटुंबास मदत देण्यात आलेली नाही. अमरावती विभागात आत्महत्यांच्या सर्वाधिक ९२ घटना यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. त्याखोलाखाल अमरावती जिल्ह्यात ८६ घटना आहेत. वाशीम जिल्ह्यात ही संख्या २९ असून बुलडाणा ५३ व अकोला जिल्ह्यात ४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

विभागात एकूण ३०६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून दरदिवशी एक, अशी सरासरी आली आहे. ही संख्या कमी करण्यात किंवा हा कलंक मिटविण्यात शासनासह समाजसेवी संस्था व मिशन अपयशी ठरल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

विभागातील जिल्हानिहाय आत्महत्या

जिल्हा एकूण घटना पात्र अपात्र प्रलंबित मदत

अमरावती २१९ ८६ ४९ ८४ ७७

अकोला १४७ ४६ ३५ ६६ ३

यवतमाळ ३१७ ९२ ९१ १३४ ११

बुलडाणा २०८ ५३ ९२ ६३ ००

वाशीम ९४ २९ २० ४५ ००

नैसर्गिक आपत्तीसोबतच शेतमालास भाव मिळत नाही. त्यामुळे आर्थिक संकट वाढत जाऊन नैराश्यापोटी आत्महत्या होत असल्याचे आतापर्यंतच्या जवळपास सर्वच प्रकरणातील निष्कर्ष आहे. शेतीवरील उत्पादनाचा खर्च कमी केल्याशिवाय शेतकऱ्याला नफा दिसणार नाही. त्यामुळे हा खर्च कसा कमी करता येईल ते प्रयत्न आवश्यक आहेत.
- जगदीश बोंडे, कृषी अभ्यासक.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com