Pune News: राज्यातील अनेक भागात जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. मात्र या नुकसानीसाठी यंदा शेतकऱ्यांना भरपाई मिळणार नाही. सरकारने स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा ट्रीगर पीक विम्यातून काढून टाकला आहे. आता शेतकऱ्यांना फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळणार आहे. पिकाचे नुकसान होऊन उत्पादकता उंबरठा उतापादनापेक्षा कमी आलीच तर भरपाई मिळेल. यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. .सरकारने चालू खरिपात सुधारित पीक विमा योजना लागू केली. योजनेतून महत्वाचे ४ ट्रीगर काढून टाकले. त्यात महत्वाचा ट्रीगर होता स्थानिक नैसर्गिक आपत्ती. या ट्रीगरमधून शेतकऱ्यांना पीक नुकसान झाल्यानंतर भरपाई मिळायची. पीक नुकसान झाल्यानंतर शेतकरी पूर्व सूचना द्यायचे. त्यानंतर विमा कंपनीचे प्रतिनिधी नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यायचे..Crop Insurance : सांगली जिल्ह्यात ५७ हजार हेक्टरवरील पिके विमा संरक्षित.एखाद्या मंडळात जर नुकसानीच्या पूर्व सूचना २५ टक्क्यांपेक्षा जास्त आल्या तर वाईड स्प्रेडमध्ये नुकसान जाऊन त्या मंडळात रॅन्डम सर्व्हे करून शेतकऱ्यांना भरपाई निश्चित केली जायची. पूर्व सूचना कमी असतील तर वैयक्तिक पातळीवर पंचनामे करून भरपाई दिली जायची. द्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार होता. मागील हंगामात जवळपास १९०० कोटी रुपये या एका ट्रीगरमधून शेतकऱ्यांना भरपाई मिळाली होती. यंदा मात्र पिकाचे नुकसान होत असनाताही शेतकऱ्यांना भरपाई मिळणार नाही. .Crop Insurance Payment : विमा परतावा खात्यात जमा होण्यास नांदेडमध्ये सुरुवात.सरकारने चालू खरिपात केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा भरपाई देण्याचे ठरविले आहे. त्यातही उंबरठा उत्पादनाची अट आहे. उंबरठा उत्पादनापेक्षा कमी उत्पादन आले तरच भरपाई मिळणार आहे. उंबरठा उत्पादन काढताना मागील ७ वर्षातील सर्वाधिक उत्पादन असणाऱ्या ५ वर्षातील उत्पादनाची सरासरी काढली जाते. त्याला ३० टक्क्यांचा जोखिमस्तर लावला जातो. त्यानंतर उंबरठा उत्पादन मिळते. .म्हणजेच पीक उत्पादनात किमान ३० टक्के घट आली तरच शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळेल. २९ टक्के उत्पादन कमी आले तरी भरपाई मिळणार नाही. ३० टक्क्यांच्या पुढच्या नुकसानीलाच भरपाई मिळेल. त्यामुळे आतापर्यंत या ट्रीगरमधून सर्वात कमी भरपाई मिळली होती. तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रीगरमधून अंदाजित नुकसानीच्या आधारे भरपाई देण्याची तरतूद होती. त्यामुळे आतापर्यंत स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रीगरमधून भरपाई जास्त मिळत होती. पण हा ट्रीगर आता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना या नुकसानीच्या काळात पीकविम्याचा आधार उरला नाही. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.