
Nanded News : गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते, पाणंद रस्ते, शेत-शिवार रस्ते, शेतावर जाण्याचे पायमार्ग मोकळे करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी १०० दिवसाचा कृती कार्यक्रम जाहीर केला आहे.
राज्यातील सर्व स्थानिक महसूल प्रशासनाला सदर कालावधीत तंतोतंत नियोजन करून प्रभावीपणे कार्यवाही करण्यासंबंधीचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर गाव नकाशात नोंद असतानाही काही शेतकऱ्यांचा विरोध व रस्त्यावरील अतिक्रमणामुळे ज्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही, अशा शेतकऱ्यांनी २५ पर्यंत तहसील कार्यालयात अर्ज करावेत, असे आवाहन तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर यांनी केले आहे.
राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना शेतावर जाण्यासाठी, शेतातील माल वाहतूक करण्यासाठी, तसेच यांत्रिकीकरणामुळे बियाणांची पेरणी, आंतर मशागत, कापणी, मळणी अशी कामे यंत्रांमार्फतच केली जात असल्यामुळे यंत्रसामग्रीसह शेतीमधील कामांसाठी आवश्यक साधनांची ने-आण करण्यासाठी शेतकऱ्याला बारमाही अतिक्रमण मुक्त रस्ते अत्यावश्यक आहेत.
परंतु, गाव नकाशात नोंद असतानाही काही शेतकऱ्यांचा विरोध व रस्त्यावरील अतिक्रमणामुळे तो रस्ता वापरू दिल्या जात नसल्यामुळे, अशी पाणंद रस्ते वादात अडकून तंटे निर्माण झाल्याच्या अनेक तक्रारी, प्रकरणे स्थानिक महसूल प्रशासनाकडे धूळखात पडली आहेत.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या शंभर दिवसीय कृती कार्यक्रमांतर्गत जे पाणंद रस्ते अतिक्रमित झालेले आहेत, असे पाणंद रस्ते ९ जानेवारी ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत विशेष मोहीम राबवून अतिक्रमणमुक्त करण्यात यावे, असे निर्देश दिलेले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.