Maharashtra E-Crop Registration Verification Controversy: पीक नोंदणीच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी पूर्वीप्रमाणेच शेतकऱ्यांना ई-पीकपाहणीचा अधिकार द्यावा, असा आग्रह राज्यातील ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी (तलाठी) शासनाकडे धरला आहे. ई-पीकपाहणीची १०० टक्के पडताळणी करण्याची जबाबदारी महसूल विभागाने सोपविल्यानंतर ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी त्याला विरोध केला आहे. .राज्यात सहायकांमार्फत होणाऱ्या पीकपाहणीच्या नोंदींची पडताळणी करण्याच्या कामावर अधिकाऱ्यांनी बहिष्कार टाकला आहे. राज्याच्या तलाठी संघटनेने महसूल विभागाला पत्र लिहून ई-पीकपाहणीच्या मूळ संकल्पनेचा विसर पडू न देण्याचा मुद्दा मांडला आहे. ‘माझी शेती-माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा’ अशी कार्यपद्धती राज्य शासनाने २०२१ पासून लागू केली..Kharif Crop Inspection: सहायकांच्या पीकपाहणीची १०० टक्के पडताळणी होणार; महसूल विभागाचे आदेश.त्यामुळे या पद्धतीशी शेतकरीदेखील परिचित झाले होते. मात्र, आता शेतकरी स्तरावरील पीकपाहणीची सुविधा अचानक बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी सहायकांना काम देण्यात आले. शेतकऱ्यांना पीकपाहणीची संधी दिल्यास पीकपाहणीचे काम पारदर्शक व वेगाने होईल, असा मुद्दा तलाठ्यांनी मांडला आहे..अॅग्रीस्टॅक प्रकल्पात अभिलेख अधिकार पडताळणी पूर्ण झालेल्या खातेदारांचे गटनिहाय ‘बकेट’ उपलब्ध आहे. तांत्रिकदृष्ट्या शेतकरी स्वतः पीकपाहणी करू शकतात. अॅग्रीस्टॅकमधील डीसीएस प्रणालीत शेतकऱ्यांमार्फत शेतातून छायाचित्र घेणे तसेच जिओ टॅगिंगसहित पीक नोंदणी करता येते..Kharif Crop Inspection: तलाठ्यांच्या बहिष्कारामुळे पीक पाहणीचे काम ठप्प.मात्र तसे न करता पीकपाहणीचे काम सहायकांना सांगून त्याची पडताळणी करण्याचे काम तलाठ्यांना देण्यात आले. मुळात पीकपाहणी करणारे सहायक दुसऱ्या यंत्रणांचे असून, त्यांना नियंत्रित करण्याची जबाबदारी तिसऱ्या यंत्रणेवर टाकली आहे. यामुळे प्रशासकीय रचना विस्कळीत झाली आहे. सहायकांनी केलेल्या त्रुटी, कामातील विलंब, नोंदींमधील अपूर्णपणा याची जबाबदारी आमच्यावर का टाकली, असा सवाल तलाठ्यांनी उपस्थित केला आहे..सहायकांना केवळ ‘ते’ काम द्या‘‘पीकपाहणीचे काम प्राधान्याने शेतकऱ्यांनाच देण्यात यावे. काही कारणांमुळे शेतकऱ्यांना ते करता न आल्यास संबंधित काम सहायकांकडे सोपवावे. सहायकाने अशी पीकपाहणी करताच संबंधित शेतकऱ्याला भ्रमणध्वनीवर संदेश देऊन सूचित करावे. शेतकऱ्याला काही आक्षेप असल्यास तो नोंदविण्यासाठी मुदत द्यावी. हरकत आल्यास तिची पडताळणी करून दुरुस्तीसह पीकपाहणीची नोंद करावी. मात्र, हरकत न आल्यास आधीचीच पीक नोंद कायम करावी. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच नोंदी प्रमाणित करण्याचे काम तलाठ्यांना द्यावे,’’ असे तलाठी संघटनेने सुचविले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.