Jalgaon News : शासनाने जो २३ फेब्रुवारीचा शासन निर्णय काढला होता त्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून त्या निर्णयाच्या पत्राची केळी पीकविमा कंपनीच्या ऑफिस समोर होळी करण्यात आली. कंपनीचे अधिकारी नसल्याने कार्यालयाला शेण लावून निषेधही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उप जिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.
शिवकॉलनी बस थांब्याजवळ पीक विमा कंपनीचे अधिकारी नसल्याने त्यांच्या कार्यालयाला शेण मारण्यात आले. पीक विम्याचे पैसे मिळाले नसल्याने शेतकरी आता हवालदिल झाला आहे, हे सरकार व्यापारी लोकांचे आहे यांना शेतकरी प्रश्नांविषयी काहीही देणे घेणे नाही, अशा शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली.
पीकविमा कंपनीच्या ऑफिसला शेण मारतो आहे, येणाऱ्या काळात मंत्री, आमदार, खासदार यांच्या तोंडावर शेण मारण्याचे काम आता शेतकरी करणार आहे. शेतकरी वर्गाला सोबत घेऊन मंत्री,आमदार, खासदार यांना गावबंदी करण्यात येणार आहे असा इशारा शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जळगांव ग्रामीणचे उप जिल्हाप्रमुख प्रा. सोनवणे यांनी दिला आहे.
शासन निर्णयाची होळी
आंदोलकांनी यावेळी शासनाचा निषेध करीत, शेतकऱ्यांना पीक विमा योजनेसंदर्भातील शासन निर्णय फसवा असल्याचा आरोप करीत, शासन निर्णयाची होळी केली. सत्ताधारी मंडळींना शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी काही देणे घेणे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नसल्याचा उद्रेक आंदोलकांनी मांडला.
संदीप चौधरी, डॉ.रमाकांत कदम, आबा कोळी, छगन खडसे, संजय मराठे, मुकेश पाटील, विनोद सपकाळे, विकास पाटील, दामू कुंभार, संजय कोळी, विजय लाड, अविनाश पाटील, सचिन चौधरी, किरण ठाकूर व शिवसैनिक व भागातील शेतकरी उपस्थित होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.