Risod News : वाशीम जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे साडेपाच हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त पिकांत जनावरे सोडण्याची वेळ आली असून त्यांचा सध्या कोणीही वाली नसल्याची स्थिती आहे.
उन्हाळी पिकांमधून कसर भरून निघेल म्हणून शेतकऱ्यांनी यावर्षी विविध पिकांची लागवड केली. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यात या वर्षी साडेपाच हजार हेक्टरवर उन्हाळी मूग, भुईमूग, उन्हाळी ज्वारी, मका, तीळ यासह कांदा बीजोत्पादनाचे क्षेत्र आहे.
मार्चच्या शेवटच्या आठवड्यात झालेला अवकाळी पाऊस व त्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातील वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे उन्हाळी पिकांना मोठा तडाखा बसला. ही सर्व पिके जमीनदोस्त झाली. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवलेले आहे. शेतकऱ्यांनी पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी शासनाकडे केली आहे.
सध्या लोकसभा निवडणुकीमुळे वातावरण तापलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नाही.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.