Drought Farmer Help : दुष्काळ जाहीर, पथकाकडून सर्वे झाला; पण शेतकऱ्यांना मदत मिळणार कधी?

Drought Declared Maharashtra : राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने माहिती संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Drought Farmer Help
Drought Farmer Helpagrowon
Published on
Updated on

Maharashtra Drought Condition : राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले आणि गडहिंग्लज या दोन तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यासह जिल्ह्यातील या दोन तालुक्यांचा सर्व्हे केंद्र सरकारकडून करण्यात येणार आहे. राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने माहिती संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज हातकणंगले तालुक्यामध्ये तब्बल २१ दिवसांपेक्षा जास्त पाऊस नसल्याने, पाणी पातळीत घट, तसेच खरिपाची ५० टक्क्यांहून अधिक घट, पिकांचे नुकसान, चाऱ्याचा गंभीर बनलेला प्रश्न, पाणी टंचाई अशा सर्व बाबींचा विचार करून दुष्काळासंदर्भातील राज्य सरकारने 'ट्रिगर टू' लागू केला.

दरम्यान हातकणंगले तालुक्यात ४७ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे मध्यम स्वरूपाच्या दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे. हातकणंगले तालुक्यात कमी पाऊस झाल्याने उत्पादकतेत घट होऊन ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा सर्व्हे महसूल विभागाकडून झाला आहे.

तालुक्यात चार महिन्यांत ७६ दिवसच पाऊस झाल्याची नोंद आहे. तर जून ते सप्टेंबर या काळात ४४ दिवस खंड पडला होता. तसेच तालुक्यात भुईमूग ९,१०७ हेक्टर, सोयाबीन १०,८७६ हेक्टर, मूग ४ हेक्टर, भात ७७० हेक्टर, उडीद ४७० हेक्टर, मका ९ हेक्टर व इतर कडधान्ये ४२ हेक्टर असे एकूण २१, ५२९ हेक्टरमध्ये खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. याशिवाय यंदाच्या हंगामामध्ये २५,६९० हेक्टर क्षेत्रात ऊस पिकाची लागण करण्यात आली आहे.

Drought Farmer Help
Maharashtra Drought Condition : दुष्काळग्रस्त ४० तालुके सोडून राज्य सरकारचा अन्य तालुक्यांना दिलासा

राज्य सरकारच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने माहिती संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार कृषी विभागाने शेतावर जाऊन रँडम पद्धतीने पाहणी करून अहवाल पाठविला. यासाठी तालुक्यातील खोची, घुणकी, रांगोळी, संभापूर, मुडशिंगी, हलोंडी या गावांची निवड करून सर्वात जास्त पिकांचे क्षेत्र असणाऱ्या एक एकराच्या पुढील दोन पिकांची निवड करण्यात आली होती.

त्यानुसार ऊस, सोयाबीन, भुईमूग या पिकांचाच समावेश जास्त होता. हे नुकसान ३६ टक्के जास्त असल्याचे मांडले. पीक कापणीपूर्वी हे सर्व्हे अपेक्षित असल्याने ते केले. त्यानुसार तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे.

दुष्काळग्रस्त तालुक्याला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हेक्टरी ६ हजार ते २० हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळू शक्यता आहे. याशिवाय जमीन महसुलात सूट, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषिपंप वीज बिलात सूट, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, पीक कर्जाचे पुनर्गठन, वीज जोडणी न खंडित करणे आदी सवलतींचा लाभ यामुळे मिळणार आहे. परंतु, शेतकऱ्यांना किती प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com