Former MP Raju Shetti : माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागच्या हंगामातील गाळप झालेल्या उसाला दुसरा हफ्ता चारशे रुपये मिळावेत, या मागणीसाठी २ ऑक्टोबरपासून आंदोलन सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज(ता.१२) गुरुवार सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील साखर कारखानदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी आमंत्रण दिले आहे.
मागच्या काही दिवसांपासून यावर कारखानदारांनी कोणतीच भूमिका घेतली नसल्याने आंदोलन तीव्र होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ही बैठक बोलवली आहे. दरम्यान या बैठकीत काय तोडगा निघतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यानी मागील गळीत हंगामातील उसाला एफआरपीप्रमाणे दर शेतकऱ्यांना दिला आहे. मात्र साखरेचा दर चांगला असल्याने साखर कारखानदारांनी किमान ४०० रुपये प्रतिटन शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी करत आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.
आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून साखर कारखान्यातून साखरेचे पोतेही बाहेर सोडण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. त्यानुसार गेली आठ-दहा दिवस साखर कारखान्यातून वाहतूक करणारे वाहनचालक आणि संघटना पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी होत आहे. दरम्यान मागच्या ८ दिवसांपासून कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यातील साखरेसह अनेक उपपदार्थ स्वाभिमानीकडून अडवण्यात येत आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.