Kharif 2025 Insurance Issue: खरीप २०२५ हंगामातील प्रलंबित पीकविमा दाव्यांच्या मागणीसाठी देवगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी सुरू केलेले ‘सरण आंदोलन’ मंगळवारी (ता. २१) तात्पुरते स्थगित करण्यात आले. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकरी प्रतिनिधी व प्रशासनाशी चर्चा केली..यावेळी खैरे यांनी आंदोलनाचे प्रमुख मनोहर बोचरे यांची मंत्री भुजबळ यांच्याशी दूरध्वनीवरून थेट चर्चा घडवून आणली. भुजबळ यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या गांभीर्याने ऐकून जिल्हाधिकारी व कृषी विभागाला सकारात्मक कार्यवाहीच्या सूचना दिल्या. तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही हा विषय मांडल्याचे सांगत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली २४ जुलै रोजी बैठक घेण्याचे निश्चित झाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले..Farmers Protest: कर्जमाफी, पीकविम्यासाठी वांगी बु. येथे अन्नत्याग आंदोलन.ज्येष्ठ नेते आबादांस बनकर, डॉ. श्रीकांत आवारे, भाऊसाहेब भवर, अशोक नागरे, बाळासाहेब लोखंडे, सागर निकाळे तसेच शिवाजी सुपनर यांनी आंदोलनकर्ते व प्रशासन यांच्यात समन्वय साधत आंदोलन सोडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.दरम्यान, सोमवारी रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकारी यांच्या समवेत आंदोलनकर्ते, महसूल व कृषी विभागाचे अधिकारी तसेच संबंधित यंत्रणांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. पीक विमा प्रश्नावर ठोस निर्णय होण्याची अपेक्षा शेतकरी बचाव कृती समितीने व्यक्त केली आहे..Farmers Protest: पीकविमा, खतटंचाईच्या प्रश्नांवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आंदोलन.आंदोलनात मनोहर बोचरे, धनंजय जोशी, जयवंत लोहारकर, राजेंद्र मेमाणे, राजेंद्र पाटील, रामेश्वर शिंदे, भाऊसाहेब बोचरे, विनोद जोशी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील, लहानू मेमाणे, भागवत बोचरे, सागर निकाळे, बाबासाहेब गुजर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले.आंदोलकांनी देवगाव महसूल मंडळातील सर्व पात्र शेतकऱ्यांचे प्रलंबित पीक विमा दावे मंजूर करणे, पीक कापणी प्रयोगातील त्रुटींची चौकशी, सर्वेक्षणातील अनियमितता दूर करणे, हवामान केंद्राच्या नोंदींची तपासणी आणि अन्यायकारक ‘ट्रिगर’ निकषामुळे वंचित शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या प्रमुख मागण्या मांडल्या..२४ जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत पीकविम्याबाबत ठोस आणि लेखी निर्णय झाला नाही, तर शनिवारपासून पुन्हा आंदोलन सुरू करण्यात येईल. यावेळी आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात उभारण्यात येईल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.– मनोहर बोचरे, आंदोलन प्रमुख.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.