.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Vikramgad News : गणेशोत्सवाला सुरुवात झाल्याने बाजारपेठा विविध वस्तूंनी सजल्या आहेत. गणपती व गौरी पूजनासाठी लागणारा केवडा दुर्मिळ झाला आहे. बाजारपेठेत केवड्याला मागणी आहे, मात्र त्याप्रमाणात फुलांची आवक कमी असल्याने किमती वाढल्या आहेत.
तालुक्यातील काही भागात नैसर्गिकरीत्या उगवलेला केवडा मिळत आहे, मात्र त्या भागातही मोठी मागणी आहे. उत्पादन घटल्याने केवड्याचा दर गगणात गेला आहे. एका पातीसाठी ६० ते ७० रुपये मोजावे लागत असल्याने भाविक नाराजी व्यक्त करत आहेत.
हिंदूंच्या धार्मिक कार्यात देव-देवतांच्या पूजेला महत्त्वाचे स्थान आहे. परंपरेनुसार प्रत्येक देवाला विशिष्ट प्रकारची पाने व फुले वाहण्याची प्रथा आहे. गणपतीला दुर्वा, जास्वंदी फूल, केवडा वाहिला जातो, तर गौरीला मोगऱ्याची फणी, गजरा, केवडा वाहिला जातो. गौरी-गणपतीच्या सणात मात्र केवडा मिळत नसल्याने केवड्याशिवाय गौरी-गणपतीची पूजा करावी लागणार आहे.
काही वर्षांपासून पूरस्थितीमुळे नदी-नाले, ओहळ, तलावाचे काठ वाहून गेले आहेत. त्यामुळे मातीची धूप झाल्याने नैसर्गिकपणे आढळणारी केवड्याची झुडपे नाहीशी झाली आहेत. नदी-नाले, तलाव आणि शेती परिसरातील केवड्याची झुडपे नष्ट होत आहेत. शिवाय केवड्याच्या काटेरी झुडपातून केवडा अलगद काढण्यासाठी शारीरिक श्रम पडतात. ७-८ वर्षांपूर्वी विक्रमगड परिसरात आढळणारा नैसर्गिक केवडा आदिवासी महिला विक्रीसाठी शहरात घेऊन जात असत; मात्र केवड्याची झुडपे नष्ट झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.