
Shirur News: टाकळी हाजी (ता. शिरूर) परिसरामध्ये गेल्या आठवड्यावर होत असलेल्या पावसामुळे भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पिकांचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शिरूर तालुक्यातील बेट भाग असणाऱ्या टाकळी हाजी वडनेर, जांबूत, पिंपरखेड,चांडोह, फाकटे म्हसे, डोंगरगण, आमदाबाद, निमगाव धुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. शेतामध्ये पाणी साचल्यामुळे भाजीपाला पिके पाण्यात सोडून गेले आहेत .
कलिंगड, खरबूज, मेथी, कोथिंबीर, झेंडू, मका पिके शेतात पाणी साचल्याने सडली आहेत . अध्यापही पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाताना रस्ता चिखलमय झाल्याने तारेवरची कसरत करावी लागत आहे.
चांगला भाव मिळेल या आशेने मोठ्या प्रमाणात महागडे रासायनिक खते व औषधे त्याचा वापर शेतकऱ्यांनी केल्याने उत्पादन खर्चही वाढला असून आता तो खर्च निघणे अवघड झाले आहे. पावसामुळे डाग पडू लागल्याने फळे खराब होत असून, बाजारभावही कमी मिळत असल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्याचीही चिंता वाढली आहे.
या परिसरात पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र गावडे यांनी शेतात जाऊन नुकसानग्रस्त शेत मालाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत शेतकरी गणेश थोरात नवनाथ शितोळे, संतोष साळवे, रामदास शितोळे उपस्थित होते .
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.