
Jalgaon News : खानदेशात मे महिन्यात पावसाने धुमाकूळ केला. जूनमध्येही पाऊस आला. पण जुलैत पाऊस हवा तसा नाही. अनेक उष्णता वाढली आहे. दुपारी ऊन तापते. यामुळे कापूस, केळी, ऊस, भाजीपाला पिकांत सिंचनाची लगबग सुरू आहे.
अनेक शेतकऱ्यांनी बागायती कापसाची लागवड केली आहे. त्यात जुलैत सतत पाऊस येईल पावसाची चांगली स्थिती राहील. सिंचनाची फारशी गरज राहणार नाही, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. ऊन तापत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. कारण सिंचन करताना ओढा-ताण होत आहे.
केळी आणि त्यात कापसाची नव्याने लागवड केली आहे. तसेच अन्य क्षेत्रात केळीची लागवड केली जात आहे, अशा शेतकऱ्यांना सिंचनासंबंधी कार्यवाही करताना नाकीनऊ येत आहेत. त्यात वीजपुरवठा अधूनमधून खंडित होत आहे. विजेची समस्या आहे.
उष्णता वाढल्याने शेतात कामे करताना शेतकरी सकाळी व सायंकाळची वेळ निवडत आहेत. कारण उष्णता मध्येच वाढली आहे. यात सुसाट वारेही असतात. यामुळे केळीची पाने फाटणे, भाजीपाला पिकांचे मंडप कोलमडणे असे प्रकार सुरू असल्याने नुकसानही होत आहे. पाऊस लांबल्यास सिंचनाची कार्यवाही सुरूच राहील.
केळी बागांबाबत काटेकोर नियोजन
लहान केळी बागांस निसवलेल्या केळी बागा आहेत. काही भागात केळीची काढणी सुरू आहे. यात शेतकऱ्यांना या बागांचे सिंचन करताना काटेकोरपणे कार्यवाही करावी लागत आहे. उष्णता ३५ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत आहे. मध्यंतरी कमाल तापमान घटले होते. दिवसा कमाल कालावधी ढगाळ वातावरण असायचे. दुपारी प्रचंड उष्णता असते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.