Agriculture Subsidy : ई-केवायसी केल्यानंतरही अनुदान मिळण्यास विलंब

Subsidy Delay : बाधित शेतकऱ्यांनी ई-केवायसी केल्यानंतर अनुदानाची रक्कम खात्यावर जमा होण्यास तब्बल महिना ते दीड महिन्याचा कालावधी लागत आहे.
Farmer E-KYC
Farmer E-KYC Agrowon

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यात २०२३ च्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झालेल्या मॉन्सून्नोत्तर पावसामुळे बाधित ४ लाख ८९ हजार ४१२ शेतकऱ्यांना अर्थसाह्य करण्यासाठी महसूल व वन विभागाने एकूण २९८ कोटी ६७ लाख २४ हजार रुपये निधी वितरणास जानेवारी महिन्यात मंजुरी दिली.

त्यानंतर विशिष्ट क्रमांक प्राप्त झालेल्या बाधित शेतकऱ्यांनी ई-केवायसी केल्यानंतर अनुदानाची रक्कम खात्यावर जमा होण्यास तब्बल महिना ते दीड महिन्याचा कालावधी लागत आहे. बँकेत चलनी नोटांचा तुटवडा असल्यामुळे रक्कम मिळण्यास विलंब लागत आहे.

Farmer E-KYC
Irrigation Subsidy : ठिबक, तुषारचे ९ कोटी रुपयांवर अनुदान प्रलंबित

नोव्हेंबर महिन्यातील मॉन्सून्नोत्तर पावसामुळे परभणी जिल्ह्यातील ५८० गावांतील २ लाख ३१ हजार ७८७ शेतकऱ्यांच्या जिरायती, बागायती, फळपिके मिळून एकूण ९५ हजार ५३ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांच्या वर नुकसान झाले आहे. वाढीव दरानुसार जिरायती क्षेत्रातील ९४ हजार ३३८.४४ हेक्टर पीकनुकसानीबद्दल १२८ कोटी ३० लाख २ हजार ७८४ रुपये,

बागायती क्षेत्रातील ७६ हेक्टर ९० पीक नुकसानीबद्दल २० लाख ७६ हजार ३०० रुपये, बहुवार्षिक ६३८ हेक्टर ३३ पीक नुकसानीबद्दल २ कोटी २९ लाख ७९ हजार ८८० रुपये असे एकूण १३० कोटी ८० लाख ५९ हजार रुपये निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील २ लाख ५७ हजार ४८७ शेतकऱ्यांच्या १ लाख २३ हजार १६४ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले. त्यात जिरायती क्षेत्रातील १ लाख २१ हजार ७१४ हेक्टरवरील पिके व १६२ हेक्टरवरील बहुवार्षिक पिकांचा समावेश आहे.

वाढीव दरानुसार जिरायती पिकांच्या नुकसानीबद्दल १६५ कोटी ५४ लाख ५१ हजार ८४० रुपये व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीबद्दल ५८ लाख ३२ हजार रुपयेनुसार १६७ कोटी ८६ लाख ६५ हजार रुपये निधी वितरणास जानेवारी महिन्यात मंजुरी देण्यात आली.

Farmer E-KYC
Farmer Incentive Subsidy : प्रोत्साहन अनुदानासाठी साडेआठ लाख शेतकरी अपात्र

त्यानंतर संबंधित तलाठी कार्यालयात विशिष्ट क्रमांक प्राप्त बाधित शेतकऱ्यांच्या याद्या प्राप्त झाल्या. अनुदानाची रक्कम बँक खात्यावर जमा होण्यासाठी जनसुविधा केंद्रावर जाऊन ई केवायसी करावे लागत आहे. ई-केवायसी केल्यानंतरही संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होण्यास महिना ते दीड महिन्याचा कालावधी लागत आहे.

जिल्हा बँकेमार्फत अनुदानाची रक्कम वाटप केली जात आहे. परंतु जिल्हा बँकेला पुरेशा प्रमाणात चलनी नोट उपलब्ध होत नसल्यामुळे अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या हातात पडण्यास आणखीनच विलंब लागत आहे.

जनसुविधा केंद्रावर केवायसी केल्यानंतर तब्बल महिनाभरानंतर खात्यावर अनुदान जमा झाले. जिल्हा सहकारी बँकेची मानवत येथील शाखेशी अनेक गावे संलग्न आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची गर्दी होते. नोटांचा तुटवडा असल्यामुळे अनुदानाची रक्कम हाती येण्यास बराच वेळ लागत आहे.
ज्ञानेश्‍वर सिद्धनाथ, शेतकरी, कोथाळा, ता. मानवत, जि. परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com