Bogus Seed : अकोले तालुक्यात सदोष बियाण्यांमुळे भातांचे नुकसान

Paddy Seed : अकोले तालुक्यातील राजूर परिसरातील सहा ते सात गावांत सदोष बियाण्यांमुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या भातपिकांचे नुकसान झाले आहे.
Paddy erity
Paddy erityAgrowon
Published on
Updated on

Nagar News : जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर परिसरातील सहा ते सात गावांत सदोष बियाण्यांमुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या भातपिकांचे नुकसान झाले आहे. जामगाव, चिंचोनडी, दिगंबर, राजूर, पिंपळगाव नाकविंदा आदी गावांतील सुमारे १३० च्या जवळपास आदिवासी शेतकऱ्यांचा सदोष बियाण्यांचा फटका बसला आहे. तालुका कृषी विभागाने पंचनामे केले असल्याचे सांगत असले तरी दोन महिन्यांनंतर दखल घेतल्याचा आरोप होत आहे.

अकोल्यात भातांचे उत्पादन घेतले जाते. यंदा काही गावांत मात्र सदोष बियाण्यांमुळे आदिवासी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी याबाबत कृषी विभागाकडे तक्रार केली होती. या शेतकऱ्यांनी राजूर येथील कृषी विक्री केंद्रातून भात बियाणे खरेदी केली होते. पिके येण्याच्या स्थितीत आल्यावर वाढीतील समतोल आणि अनेक ठोंबाना तांदूळ आला नसल्याचे स्पष्ट झाले.

Paddy erity
Bogus Seed Act : प्रस्तावित कृषी कायद्यांना सीड इंडस्ट्रीचाही तीव्र विरोध ; ‘सियाम’चा बंदला पाठिंब्याची घोषणा

त्यानंतर तक्रार करून सदोष बियाणे व भेसळयुक्त बियाणे विकलेल्या कंपनीवर व विक्रेत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. महात्मा फुले कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ, तालुका कृषी अधिकारी व पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांनी दोन दिवसांपूर्वी मोजक्याच शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी सुरेश नवले, सुनील कुंडे, सुशांत आरोटे, सागर शेळके, सोमनाथ आहेर, संतोष घोडके, संदीप सातपुते उपस्थिती होते. सदोष बियाणे विकणाऱ्या कंपनीवर गुन्हे दाखल करावेत व झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.

Paddy erity
Bogus Seed: बियाणे कंपन्या आणि सरकारच्या वादात शेतकऱ्यांना फटका बसणार!

केवळ आठ शेतकऱ्यांचे पंचनामे

राजूर व परिसरातील जामगाव, दिगंबर, चोडी, पिंपळगाव नाकविंदा गावांतील शेतकऱ्यांच्या भातपिकांचे सदोष बियाण्यांमुळे नुकसान झाले. १३० शेतकऱ्यांना याचा फटका बसला. दोन महिन्यांपूर्वी तक्रार दिलेली असताना कृषी विभागाने दखल घेतली नाही.

आता चार दिवसांपूर्वी भेटी देऊन पंचनामे करण्याचा दिखावा केला. त्यातही केवळ ८ ते १० शेतकऱ्यांचे पंचनामे केले. कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांना न्याय देण्याऐवजी सदोष बियाणे विक्रेत्यांनी पाठीशी घालत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

राजूर व परिसरातील काही गावांत भाताच्या सदोष बियाणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तक्रार करूनही कृषी विभागाचे अधिकारी गांभिर्याने घेत नाहीत. सदोष बियाणे देणाऱ्या कंपन्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करून कारवाई करावी व आदिवासी शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई मिळणे गरजेचे आहे. दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन करू.
सुरेश नवले, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com