
Palghar News : शेतीसाठी बेसुमार खर्च करूनदेखील अपेक्षित उत्पन्नाची स्वप्ने अपूर्णच राहतात; परंतु अलीकडच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाने डहाणूतही वेग घेतल्याने शेतकरी आधुनिक विचारसरणीचा बनला आहे.
अलीकडच्या काळात शेतकरी पारंपरिक पद्धतींना फाटा देत आधुनिक पद्धतीने रब्बीमध्ये कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने हरभरा, मसूर अशा शाश्वत उत्पन्न देणाऱ्या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल आहे.
शेतामध्ये परिस्थितीनुसार सातत्याने बदल करीत असल्याने बदलत्या हवामानाला सामोरे जाण्याचे धाडस निर्माण झाले आहे. हरभरा पिकातून सुरुवातीला शेंडे खुडून कोवळी भाजी आणि नंतरच्या काळात घाटे भरून हरभऱ्याचे उत्पन्न अशा दुहेरी उत्पादनामुळे अनेक शेतकरी हरभऱ्याची लागवड करीत आहेत. सद्यस्थितीत हरभरा पिकाची काढणी झाली असून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळाले आहे.
सद्य:स्थितीत हरभऱ्याचे पीक निघाले असून झोडपणीदेखील झाली आहे. चण्याची उन्हात वाळवणी करून पावसाळ्यात घरखर्च आणि वापरण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. बाजारात चणाडाळ शंभर रुपये किलो आहे.
बाजारातून विकत घेण्यापेक्षा घरचेच मिळालेले उत्पादन पावसाळ्यात वापरासाठी ठेवण्यात आले आहे, असे शेतकरी सांगतात. पावसाळ्यात भातकापणीनंतर क्षेत्र पडीक राहण्याऐवजी हरभरा लागवड केल्यास घरखर्चासाठी पुरेल एवढे चण्याचे उत्पादन निघू शकते.
बियाण्याचे वाटप
डहाणू तालुक्यात भातपिकानंतर शेतकऱ्यांना दुसरे पीक घेता यावे, या उद्देशाने उर्वरित ओलाव्यावर हरभरा पीक जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावे, या उद्देशाने कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकासाठी हरभरा आणि मसूर बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे. तालुक्यामध्ये १९६ हेक्टरवर हरभरा, तर ४० ते ४५ हेक्टर क्षेत्रावर मसूर पिकाची लागवड करण्यात आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.