Akola News : जिल्ह्यात गेल्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसाने तब्बल एक लाख सहा हजार ६४९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यासाठी सुमारे ९२ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची गरज आहे. एक लाख २० हजार ६९७ शेतकऱ्यांना आपत्तीचा फटका बसल्याचा अहवाल विभागीय आयुक्तालयाकडे सादर करण्यात आला आहे..जिल्हयात ऑगस्ट महिन्यात १७ व १८ या तारखांना तसेच २८ व २९ तारखांना अतिवृष्टी झाली होती. यामुळे नदी-नाल्यांना सर्वत्र पूर वाहले. अतिवृष्टीने पिकांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीचा महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पंचनामा करून अहवाल बनवला. .Rain Crop Damage : सांगलीच्या दुष्काळी तालुक्यांत पावसाचा फटका.बुधवारी (ता.२४) याचा संयुक्त अहवाल अमरावती विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला. यात जिल्ह्यातील सुमारे सहाशे पेक्षा अधिक गावांमध्ये एक लख २० हजार ६४९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. .Crop Damage : संत्रा उत्पादकांसह पारंपरिक पिकांचे ७५ टक्के नुकसान .अतिवृष्टीत अकोट, अकोला, बाळापूर, पातूर, तेल्हारा आणि मूर्तिजापूर तालुक्यात सर्वाधिक एक लाख २९ हजार ६०४ शेतकऱ्यांचे १ लाख ६ हजार १०१ हेक्टरचे नुकसान झालेले आहे..त्यात कपाशी पिकाचे ४७ हजार४०९ हेक्टर, सोयाबीन ४६ हजार ४३२ हेक्टर, तूर ११ हजार ६१२, मूग १३.१५ हेक्टर, उडीद ९.७८ ज्वारी ३७ हेक्टर नुकसान दाखविले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.