
Parbhani Crop Management News : पावसाच्या आगमनानुसार पीक नियोजन करावे. अनुरूप तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. माती परीक्षणानुसार खतांच्या मात्रा द्याव्यात. सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता तपासूनच जमिनीत पुरेसा ओलावा उपलब्ध झाल्यानंतर पेरणी करावी असा सूर कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी व्यक्त केला.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाच्या कोरडवाहू एकात्मिक शेती पद्धतीअंतर्गत आडगाव (ता. पालम) येथे सोमवारी (ता. ५ ) आयोजित ‘‘खरीप हंगामपूर्व नियोजन’’ या विषयावर कार्यक्रम करण्यात आला होता.
अध्यक्षस्थानी डॉ. किशोर कुगने हे होते तर सरपंच बाळासाहेब ढोले, उपसरपंच रमाकांत पाऊडशेटे, वनामकृवितील कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. वा. नि. नारखेडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ (कृषिविद्या) डॉ. ए. के. गोरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ (मृद्शास्त्र) डॉ. जी. आर. हनवते, कनिष्ठ शास्त्रज्ञ (मृद्शास्त्र) डॉ. पी. एच. गौरखेडे, एम. डब्ल्यू. राठोड, मोतीराम ब्याळे, आदींची प्रमुख होती.
डॉ. कुगने यांनी गावात राबविण्यात येत असलेल्या कोरडवाहू एकात्मिक शेती पद्धती या योजनेचा तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा सल्ला दिला. डॉ. हनवते म्हणाले, की रासायनिक खतांचा वापर योग्य वेळी व योग्य जागेत टाकून करावा जेणेकरून अतिरिक्त खताची मात्रा दिली जाणार नाही.
तणांची वाढ, जमिनीचा सामू वाढणे अशा एक व अनेक जमिनीवर होणारे अनिष्ट परिणाम होण्यास टाळले जाऊ शकते. शेतात एकात्मिक अन्नद्रव्ये पद्धतीचा वापर करण्यावर भर द्यावा, असेही म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.