
Jalgaon News : जिल्ह्यात हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत २०२४-२५ मध्ये सहभागी झालेल्या सहा हजार शेतकऱ्यांना तांत्रिक कारणामुळे केळी पिकासंबंधी पॉलिसी आयडी मिळाला नव्हता. याबाबत शेतकरी व विविध संघटनांच्या पाठपुराव्यानंतर शेतकऱ्यांना पॉलिसी ओळख क्रमांक मिळाला आहे.
सुमारे सहा हजारांवर शेतकऱ्यांनी खासगी बँकांच्या माध्यमातून केळी पिकासाठी विमा संरक्षण धेण्यासाठी विमा हप्ता भरला होता. परंतु बँकांनी हा हप्ता वेळेत पीकविमा योजनेच्या पोर्टलवर सादर न केल्याने सहा हजारांवर शेतकऱ्यांना पॉलिसी ओळख क्रमांक मिळाले नव्हते. हे क्रमांक न मिळाल्याने संबंधित शेतकऱ्यांचा विमा योजनेतील सहभाग दिसत नव्हता. यामुळे शेतकरी पुढे विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहतील, अशी स्थिती होती.=
याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी बँका व विमा कंपनीकडे गाऱ्हाणे मांडले. बँकांची चूक लक्षात आणून दिली. तसेच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, शेतकरी कृती समितीचे एस. बी. पाटील, रघुनाथदादा प्रणित व शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना, शेतकरी आदींनी याबाबत विमा कंपनीकडे सतत पाठपुरावा केला.
यानंतर संबंधित शेतकऱ्यांना पॉलिसी ओळख क्रमांक नुकतेच मिळाले आहेत. यामुळे या शेतकऱ्यांचा फळ पीकविमा योजनेतून केळी पिकासंबंधी अधिकृत विमा संरक्षण मिळाले आहे. थंडी, अधिक तापमान, वेगाचा वारा किंवा वादळ, गारपीट आदी जोखमांमध्ये या योजनेतून केळी पिकास संरक्षण मिळते.
पात्र शेतकऱ्यांना जुलै किंवा विमा संरक्षण कालावधी आटोपल्यानंतर ४५ दिवसांत परतावे देण्याचे निर्देश या योजनेतून आहेत. जिल्ह्यातील सुमारे ७२ हजार केळी उत्पादक शेतकरी या योजनेत २०२४-२५ मध्ये सहभागी झाले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.