Farmer Relief: अहिल्यानगर जिल्ह्यात मार्च आणि एप्रिल महिन्यात पूर्वमोसमी पाऊस आणि गारपिटीचा ३०० गावांना फटका बसला. या बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. मृत व्यक्ती, शेती पिकांच्या नुकसान झालेले शेतकरी आणि मालमत्ता बाधित कुटुंबांसाठी २५ कोटी २० लाख भरपाईचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने नाशिक विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे..अहिल्यानगर जिल्ह्यात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पूर्व मोसमी पावसाने टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या भागांत कोसळला. दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात १४४ गावांतील १५ हजार ५५८ हेक्टरवर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. याचा फटका १५ हजार ३५२ शेतकऱ्यांना बसल्याचे प्राथमिक अहवालात दिसून आले होते. संगमनेर, अकोले आणि अहिल्यानगर तालुक्यात २६ ते २९ मार्च दरम्यान झालेला पाऊस व वादळी वाऱ्यामुळे १२ गावातील १ हजार १०४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. .Crop Damage Compensation: नाशिक, जळगावमधील १७ हजार शेतकऱ्यांना दिलासा, अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी १७ कोटी मदत मंजूर.याचा फटका २ हजार ७०३ शेतकऱ्यांना बसला आहे. संगमनेर तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. तालुक्यातील ७ गावातील १ हजार ६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे २ हजार ४८५ शेतकरी बाधित झाले आहेत. कृषी आणि महसूल विभागाने बाधित क्षेत्राचे पंचनामे केले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंते आणि महसूल विभागाने मालमत्तेच्या नुकसानीचे पंचनामे केले. १४ हजार ३४९.३२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले..जिरायती क्षेत्रासाठी ८ हजार ५०० रुपये, बागायती क्षेत्रासाठी १७ हजार तर फळ बागांसाठी २२ हजार ५०० रूपये हेक्टरी भरपाईचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. वीज पडून मृत झालेल्या व्यक्तींसाठी ५ लाख तसेच मालमत्ता नुकसानीच्या प्रमाणात भरपाईचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पूर्व मौसमी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी २५ कोटी २० लाखांचा प्रस्ताव नाशिक विभागीय आयुक्तांना पाठविला आहे. आयुक्त हा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करणार आहेत. त्यानंतर भरपाईचा प्रस्तावाला मंजुरी दिली जाणार आहे..Crop Damage Compensation: कीड-रोगांमुळे पिकांचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांना भरपाई मिळणार का? कृषिमंत्र्यांचा मोठा खुलासा.तालुकानिहाय बाधित गावे आणि कंसात शेतकरीनगर- ५ (६४३), पारनेर-२३ (४ हजार ८६९), पाथर्डी ४ (१६०), कर्जत ४ (४), श्रीगोंदे ५६ (१ हजार ९१२), राहुरी ८ (१ हजार ४९०), नेवासे- ३९ (१ हजार ४६६), संगमनेर १९ (५ हजार ५९९), अकोले ११० (९ हजार ५३४).एप्रिलमध्ये चार दिवसांत मोठे नुकसानमार्च महिन्यानंतरही एप्रिल महिन्यात सुरुवातीलाच चार दिवस पूर्वमोसमी पाऊस, गारपीट झाली. पूर्वमोसमी पावसाचा फटका श्रीगोंदेसह दक्षिणेतील गावांना बसला. रब्बी हंगामातील गहू, मका, कांदा, झेंडू, शेवंती भाजीपाला आणि टोमॅटो पिकांचे नुकसान झाले आहे. आंबे, द्राक्षे, पपई, संत्रा, मोसंबी, टरबूज आदी फळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. चार दिवसात एकून १६,६६९ शेतकऱ्यांचे ११ हजार ४८० हेक्टरवर नुकसान झाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.