Chhatrapati Sambhajinagar: गावशिवारातील कपाशी पिकावर ‘आकस्मिक’ संकट येऊन अनेक शेतकऱ्यांचे ६० ते १०० टक्के पीक बळी गेल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. नुकसाभरपाई यासंदर्भात चिंतन करण्यासाठी लाखेगाव येथे नुकतेच विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यात नुकसाभरपाईसाठी अडचणीच्या शासन निर्णयावर बोट ठेवत न्यायासाठी लढण्याचा निर्धार करण्यात आला..लाखेगाव येथे नुकत्याच झालेल्या या ग्रामसभेत तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, उपकृषी अधिकारी अशोक पठाडे, कृषी मंडळ अधिकारी संदीप वराळे, कृषी सहायक अधिकारी मोहन जाधव, तसेच ग्रामसेवक बी. डी. मेश्राम यांनी शेतकरी बांधवांशी थेट संवाद साधला. ग्रामसभेत गावातील सर्व शेतकरी उपस्थित होते..Cotton Crop Loss : अति पावसाने कपाशीचे पीक गेले हातातून .या वेळी पिकाचे झालेले नुकसान, त्यावरील शासकीय मदत आणि आलेले संकट नेमके कशामुळे आले ते नियंत्रणासाठी तत्काळ उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. गाव शिवारातील सुमारे ५५ ते ६० शेतकऱ्यांचे या आकस्मिक संकटात नुकसान झाले विशेष म्हणजे यामध्ये दरवर्षी चांगले उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचाही समावेश असल्याचे कृषी भूषण श्री घुनावत यांनी सांगितले..Cotton Crop Loss : कापूस पिकातील तोटा वाढला.तज्ज्ञांनी आकस्मिक आलेल्या या संकटाची पाहणी करावी, त्यावरील शिफारसीय उपाय, आणि पुढील हंगामात पीक संरक्षणासाठी घ्यावयाच्या काळजीविषयी मार्गदर्शन करावे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या वेळी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय व कृषी विभागाकडे पंचनाम्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला..ग्रामसभेत शेतकरी बांधवांनी आपली समस्या व मागण्या मांडत तत्काळ शासकीय मदतीची अपेक्षा व्यक्त केली. कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या निवेदनाची दखल घेत तहसीलदार यांना या संदर्भात कळविल्याचे सांगितले. पैठण तालुक्यात आडुळ मंडलातच अशा प्रकारे नुकसानीचे क्षेत्र असल्याची माहितीही ‘कृषी’च्या अधिकाऱ्यांनी दिली. पंचनामे करण्यात प्रशासकीय दिरंगाई झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी ग्रामसभेत दिला..संकट नेमक कशामुळे?संकट नेमके कशामुळे आले हे कळायला मार्ग नाही. संबंधित तज्ज्ञांनी त्यांची पाहणी केली आणि कारण शेतकऱ्यांना सांगितले तर निदान पुढच्यावर्षी तरी अशा संकटापासून बचाव करता येईल. काही शेतकऱ्यांचे नुकसान असल्याने भरपाई मिळण्यात अडचणी येतात. असे नियम शेतकऱ्यांना अडचणीचे नाहीत का, याचा विचार शासन आणि प्रशासनाने करावा, अशी मागणी बालचंद घुनावत, साईनाथ रहटवाडे, विक्रम घुनावत यांनी केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.