Nagpur News: दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली होती. त्या संदर्भातील हालचालींना आता बिहार निवडणुकीमुळे वेग आला. मात्र त्याच वेळी शेतकऱ्यांसाठीच्या स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी केव्हा होणार, असा सवाल ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी उपस्थित केला आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्री. जावंधिया यांनी पत्र लिहिले आहे. त्यानुसार, दिल्ली विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवत केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूष करण्यासाठी आठव्या वेतन आयोगाची खेळी खेळण्यात आली. त्यावेळी केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग दिला जाणार असल्याचे जाहीर करून टाकले..Farmer Subsidy Challenges: गेवराईतील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार तरी कसे?.त्यानंतर आता बिहार निवडणुका जिंकण्यासाठी आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीकरिता तीन सदस्यीय समितीची स्थापना केली. अठरा महिन्यांच्या कालावधीत ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन तर ६९ लाख सेवानिवृत्तांच्या निवृत्तिवेतनात किती वाढ करायची? याविषयीची शिफारस ही समिती करणार आहे..Farmer Death: मराठवाड्यात ३०० दिवसांत ८९९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या.शासकीय कर्मचाऱ्यांचे व्यापक हित जपण्यासाठी शासन प्रयत्नशील असताना त्याचवेळी अन्नदाता, ऊर्जादाता अशा विशेषणांनी ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांचाही विचार करण्यात यावा. त्याकरिता त्यांच्यासाठी स्थापन डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी..शासकीय कर्मचाऱ्यांना १५०० रुपये रोज मिळत असताना त्याच वेळी गावखेड्यातील नागरिकांना किमान १००० ते १२०० रुपये मिळाले पाहिजे. त्याकरिता २००६ पासून प्रलंबित डॉ. स्वामिनाथन आयोगातील शिफारशीत ‘एमएसपीसी’नुसार शेतीमालाला बाजारभाव मिळणे गरजेचे आहे.विजय जावंधिया, ज्येष्ठ शेतकरी नेते, नागपूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.