Nagpur News: काँग्रेस हा इंदिरा गांधींच्या काळातही कधीच डाव्या विचारांचा पक्ष नव्हता. मात्र राहुल गांधींनी पक्षाची धुरा सांभाळल्यापासून काँग्रेस अति डाव्या विचारांचा पक्ष झाला आहे. यामुळे भावी पिढीत देशांतर्गत संस्थांविषयी नकारात्मकता पसरल्यास हा देशातील लोकशाहीसाठी मोठा धोका असल्याची चिंता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. .नागपुरात माध्यम प्रतिनिधींशी अनौपचारिक चर्चा करताना श्री. फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, ‘‘आपल्याच संस्थांचा विरोध करणे गैर आहे, सर्वाेच्च न्यायालयाने एखादा निर्णय हा काँग्रेस पक्षाच्या बाजूने दिला, त्या वेळी त्यांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असतो..CM Devendra Fadnavis Visit : मुख्यमंत्र्यांची समज, पोलिसांची दंडेली....याउलट राहुल गांधींच्या विरोधात न्यायालयाचा निर्णय आल्यास न्यायव्यवस्था कशी सरकारधार्जिणी आहे, असे सांगत फिरतात. हे देशाच्या लोकशाहीसाठी धोक्याचे आहे.’’ शक्तिपीठ प्रकल्पाबाबत त्यांनी सांगितले, ‘‘याला जनसामान्यांपेक्षा राजकीय नेत्यांचाच सर्वाधिक विरोध असल्याचे निदर्शनास आले आहे..परंतु त्यांच्या याबाबत असलेला संभ्रम दूर करण्यात आला आहे.’’ ते म्हणाले, ‘‘प्रकल्पाची घोषणा झाल्यावर कुठल्याही प्रकल्पाला विरोध असतो, परंतु प्रकल्पामध्ये ज्यांची जमीन जाणार असते, त्यांच्याशी योग्य चर्चा केली, त्यांना प्रकल्पाचे महत्त्व पटवून दिले आणि चांगला मोबदला दिला, की लोक जमिनी देण्यास संमती दर्शवतात.’’ नवीन नागपूर व्यावसायिक केंद्र म्हणून उदयास येणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.