Har Ghar Jal Mission : ‘हर घर जल’ योजनेबाबत संभ्रम

Water Supply Scheme : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘हर घर जल’ योजनेत पाइपलाइन अर्धवट असून, या पाइपलाइनद्वारे नळजोडसाठी निधी नसल्याने योजनेला घरघर लागली असल्याचे चित्र सध्या पुरंदर तालुक्यात आहे.
Jal Jeevan Mission
Jal Jeevan MissionAgrowon
Published on
Updated on

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘हर घर जल’ योजनेत पाइपलाइन अर्धवट असून, या पाइपलाइनद्वारे नळजोडसाठी निधी नसल्याने योजनेला घरघर लागली असल्याचे चित्र सध्या पुरंदर तालुक्यात आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी या योजनांसाठी मंजूर झाला आहे. मात्र या योजनेमध्ये प्रत्यक्ष ग्रामस्थांना पाणी कधी मिळणार याकडे दुष्काळी भागाचे लक्ष लागले आहे.

पुरंदर तालुक्यात सध्या दुष्काळाचे सावट आहे. नोव्हेंबरध्येच अनेक ठिकाणी विहिरी, बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये पाणी योजना पूर्णत्वास गेली असती तर किमान प्यायला पाणी मिळाले असते अशी भावना शेतकरी आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Jal Jeevan Mission
Jal Jivan Mission : ‘जलजीवन’च्या ९५ योजनांच पूर्ण

या योजनेसाठी केवळ पाइपलाइनसाठी निधीची तरतूद असून वैयक्तीक नळ जोड देण्यासाठी यामध्ये कोणतीही तरतूद केलेली नाही. यामुळे या योजनेबाबत नागरिकांमध्ये मोठा असंतोष पसरला आहे. पाण्याची लाइन होत असतानाच सोबतच कनेक्शन मिळावे, अशी मागणी अनेक ग्रामपंचायतीतून होत आहे.

Jal Jeevan Mission
Har Ghar Jal Yojana : पाणीपुरवठा योजनेच्या कामांच्या गुणवत्तेकडे लक्ष द्या

नुकताच केंद्राच्या पथकाने पुरंदर तालुक्याचा दुष्काळी दौरा केला. या वेळी प्रामुख्याने त्यांनी शिवरी, तक्रारवाडी, साकुर्डे आधी गावातील दुष्काळाची भीषणता पाहिली आहे. याच भागामध्ये शिवरी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पिलाणवाडी जलाशयातून पाणीपुरवठा सुरू आहे. परंतु सध्या अनेक ठिकाणी ही योजना नादुरुस्त असल्याने नागरिकांपर्यंत पुरेशा दाबाने पाणी पोहोचत नाही. अशावेळी या ठिकाणी जलजीवन मिशनचे काम तातडीने करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

शिवरी प्रादेशिक योजनेलाच नाही तर जल जीवन मिशनच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातच नव्याने मंजूर झालेल्या कोणत्याही योजनेत नळजोड देण्यासाठी निधीची तरतूद नाही ही बाब आम्ही वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तरी ग्रामपंचायतीने आधी पाइपलाइन पूर्ण करून घ्याव्यात नंतर नळजोड साठी निधी मंजूर झाल्यावर ते काम करू.
- राजकुमार जाधव, उपकार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.
जलजीवन मिशनच्या माध्यमातून होणारी पाणी योजना ही साधारणपणे यापुढे ३० ते ३५ वर्षांचा विचार करून होत असून एकदा पाइपलाइन झाली आणि यानंतर कनेक्शन देण्यासाठी ती पुन्हा खोदावी लागली तर साधारणपणे एका गावामध्ये ७०० ते ८०० नळजोड आहेत. अशा वेळी एवढ्या ठिकाणी ती पाइपलाइन खोदावी लागेल व यातून मोठ्या प्रमाणावर पाइप फुटण्याच्या शक्यता आहे व यामुळे योजना जरी नवीन असली तरी सुरू होण्यापूर्वीच दुरुस्तीतून खिळखिळी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पाइपलाइनच्या टिकाऊ क्षमतेबाबत चिंता वाटते. तरी शासनाने पाइपलाइन सोबतच वैयक्तिक जोड दिले तर पाइपलाइन दीर्घकाळ टिकू शकते.
- भाऊसाहेब कामथे, सरपंच, खळद.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com