Akola News : राज्यातील चार कृषी विद्यापीठांमधील वरिष्ठ संशोधन सहायक (एसआरए) या पदाची भरती प्रक्रिया लेखी परीक्षा (फक्त २०० गुणांची) घेऊन पूर्ण करावी, अशी मागणी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर पदवीधारक विद्यार्थ्यांनी कृषिमंत्र्यांकडे केली आहे.
याबाबत विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये विविध संवर्गाच्या ६० टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासन, संशोधन आणि शिक्षण या बाबींवर रिक्त पदांचा ताण वाढला आहे. ३१ ऑक्टोबर २०२२ नुसार राज्य शासनाने भरती प्रक्रियेत शिथिलता आणली आहे. उपरोक्त पदांची भरती तातडीने करावी.
या नोकरभरतीची अनेकजण प्रतीक्षा करीत आहेत. तसेच राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये आगामी काळात होणाऱ्या वरिष्ठ संशोधन सहायक पदांची भरती प्रक्रिया ही २०० गुणांची लेखी (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी) परीक्षा घेऊन पूर्ण करावी.
यापूर्वी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामार्फत २०१७ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करून ११ नोव्हेंबर २०२० रोजी या पदाची लेखी परीक्षा घेत उमेदवारांची सरळसेवेमार्फत निवड करण्यात आली
‘एसआरए’ पदासाठी किमान शैक्षणिक अर्हता ही पदव्युत्तर पदवी आहे. त्यामुळे अतिरिक्त मूल्यांकन, गुणांकन पद्धतीचा अवलंब केल्यास शैक्षणिक अर्हताधारण केलेल्या उमेदवारांना यामुळे नुकसान होऊ शकते. याबाबत शंभरावर विद्यार्थ्यांनी हे निवेदन कृषिमंत्र्यांना पाठवले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.