Unseasonal Rain Crop Damage : राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज (ता.२४) कॉंग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईची मागणी लाऊन धरली. सोबतच राज्यात अनेक भागांत झालेल्या गारपिटीमुळेसुद्धा रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या या गंभीर स्थितीवर त्यांनी तातडीने सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली. गेल्या वर्षापासून शेतकरी आर्थिक अडचणीत असून नुकसानभरपाई, बोनस आणि पिकांच्या खरेदीचे पैसे अजून मिळाले नसल्याचे त्यांनी नमूद केले..शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे ताबडतोब द्या…वडेट्टीवार यांनी सांगितले की, कोकण, विदर्भ आणि मराठवाडा भागात नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले. तरीही अनेक शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. गेल्या वर्षी जाहीर केलेला बोनस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. तसेच २०२५ च्या हंगामातील शेतकऱ्यांच्या पिकाच्या खरेदीचे पैसेही प्रलंबित आहेत..Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते.तसेच ते पुढे म्हणाले, त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत असून पुढील पेरणीसाठी पैसे उभे करणे कठीण झाले आहे. वाढते खर्च, कर्ज आणि कमी दर यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था अडचणीत आल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने प्रत्यक्ष मदत करावी आणि आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान यावेळी सभागृहात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता..राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस…राज्यातील अनेक भागांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यांत पाऊस झाला, तर काही ठिकाणी गारपीट झाली. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव, आर्णी, महागाव आणि उमरखेड भागात हरभरा आणि गहू पिकांचे मोठे नुकसान झाले. सध्या हरभरा काढणी सुरू असल्याने नुकसान अधिक झाल्याचा अंदाज आहे..Farmer Compensation: ऐंशी हजार शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा.नांदेड जिल्ह्यात मोठे नुकसान...नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाल्याने गहू, मका, ज्वारी तसेच आंबा पिकांचे नुकसान झाले. परभणी जिल्ह्यातही अनेक भागांत पावसामुळे हरभरा, ज्वारी, गहू आणि करडई पिकांचे नुकसान झाले. बीड जिल्ह्यातील वडवणी आणि धारूर तालुक्यांत ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, भाजीपाला तसेच फळपिकांचे नुकसान झाले आहे..कोकणात हवामान बदलामुळे आधीच काजू आणि आंबा पिकांना फटका बसला होता. आता अवकाळी पावसामुळे फळगळ होऊन नुकसान वाढण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आणि फोंडाघाट परिसरात पावसामुळे बागायतदार शेतकरी चिंतेत आहेत..दरम्यान, विधानमंडळाचे कामकाज अधिक पारदर्शक करण्यासाठी डिजिटल ट्रॅकिंग प्रणाली सुरू करण्याची माहिती सभागृहात देण्यात आली. या प्रणालीमुळे प्रश्न, विधेयके आणि चर्चेची माहिती ऑनलाइन उपलब्ध होणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.