
Satara News: अतिवृष्टीत नुकसानीच्या भरपाईत शासनाने बदल केल्यामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल पुन्हा नव्या दराने करण्यात आला आहे. याचा फटका बाधित शेतकऱ्यांना बसणार असून, त्यांना मिळणारी भरपाईची रक्कम कमी होणार आहे.
नवीन दराने १२ कोटींची नुकसानीची रक्कम सात कोटी ९१ लाखांवर आली आहे. त्यामुळे १४ हजारांवर शेतकऱ्यांना या भरपाईत आर्थिक फटका बसला आहे.अतिवृष्टीच्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने जुन्या दराने पंचनामे करून अहवाल तयार केला होता.
त्यानुसार बाधित १४ हजारांवर शेतकऱ्यांना १२ कोटी रुपयांची मदत मिळणार होती. पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठविला होता. पुन्हा नवीन दरानेच भरपाई द्या, अशी सूचना मदत व पुनर्वसन विभागाने जिल्हा प्रशासनाला केली आहे.
दोन हेक्टरच्या मर्यादेत भरपाई देताना कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये, बागायती पिकांसाठी हेक्टरी १७ हजार रुपये, तर फळ पिकांसाठी २२ हजार पाचशे रुपये प्रतिहेक्टरची भरपाई देण्याचा नवीन दर ठरला आहे. ही भरपाईची रक्कम जुन्या दरापेक्षा पाच कोटींनी कमी होत आहे.
मे ते जून या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीत १४ हजार ६९५ शेतकऱ्यांचे ४,४४२.५ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले होते. त्याची भरपाईची रक्कम सात कोटी ९१ लाख ५० हजार रुपये होत आहे. फळपिकांचे बाधित शेतकरी १२०७ आहेत.
त्यांचे बाधित क्षेत्र ४९२.३५ हेक्टरवरील असून, त्याची रक्कम एक कोटी सहा लाख रुपये होत आहे बागायती क्षेत्रातील १३ हजार ४८७ शेतकऱ्यांचे ३९७६.१० हेक्टरवरील नुकसान झाले आहे. त्याची भरपाईची अपेक्षित रक्कम सहा कोटी ८४ लाख ९८ हजार रुपये आहे. जिरायतीचे०.१० हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झालेले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.