Jalgaon News: दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यासह खानदेशात थंडीचे पुनरागमन झाले आहे. पण हुडहुडी भरविणारी थंडी कमी झाली आहे. यंदाच्या जानेवारीच्या सुरुवातीला ढगाळ वातावरणाने थंडी कमी झाली होती. आता थंडी पुन्हा वाढू लागली आहे. .धुळ्यातही पारा कमी झाला आहे. साधारणत: नोव्हेंबर ते फेब्रुवारी अशा चार महिन्यांत थंडी असते. डिसेंबरमध्ये थंडी जाणवते, असा नेहमीचा अनुभव आहे. डिसेंबर महिना थंडीचा होता. जानेवारीच्या सुरुवातीला ढगाळ वातावरणाने थंडी कमी झाली..Maharashtra Cold Wave: ढगाळ हवामानामुळे थंडी ओसरली.हु़डहुडी नाहीथंडीचा मोसम जानेवारीच्या अखेरीस संपुष्टात येतो. ऐन जानेवारीच्या सुरुवातीस थंडी कमी झाली. मध्यंतरी ढगाळ वातावरणाने दुपारी उकाडा वाढला होता..Cold Wave : मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात किमान तापमानात घट.पण आता दोन दिवसांपासून थंडी वाढत आहे. पण हुडहुडी नाही. मागील वर्षी जानेवारीच्या अखेरीस थंडी वाढली होती. उत्तरेकडील गार वारे, बर्फवृष्टीचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात थंडी वाढते. पण यंदा जानेवारीच्या मध्यानंतर थंडी कमी झाली. .या थंडीचा रब्बीला लाभ होत आहे. परंतु केळी, कलिंगड, वेलवर्गीय पिकांना फटका बसत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकरी सिंचन, खते याबाबत काटेकोर नियोजन करीत आहेत. केळी बागांना मोठा फटका डिसेंबरमधील थंडीमुळे बसला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.